Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Caste Census : केंद्र सरकारने माघार घेतली का? काँग्रेसची जातीय जनगणेवरून टीका

जारी केलेल्या जनगणनेच्या अधिसूचनेत जातीगणनेचा उल्लेख नाही. हा सरकारचा यू-टर्न मानावा का? असं म्हणत काँग्रेसने जातीय जनगणना, सायप्रस दौरा आणि अहमदाबाद अपघातावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 17, 2025 | 10:06 PM
केंद्र सरकारने माघार घेतली का? काँग्रेसची जातीय जनगणेवरून टीका

केंद्र सरकारने माघार घेतली का? काँग्रेसची जातीय जनगणेवरून टीका

Follow Us
Close
Follow Us:

काँग्रेसने जातीय जनगणना, सायप्रस दौरा आणि अहमदाबाद अपघातावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस संपर्क जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून थेट सरकारवर हल्लाबोल केला आणि म्हटले की, जारी केलेल्या जनगणनेच्या अधिसूचनेत जातीगणनेचा उल्लेख नाही. हा सरकारचा यू-टर्न मानावा का? यासोबतच जयराम यांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला आहे.

Maharashtra Politics: शरद पवारांच्या “संधीसाधू लोकांना…” या विधानाचा अजित पवारांकडून एका वाक्यात समाचार; म्हणाले…

सरकार जनगणनेत तेलंगणा मॉडेल लागू करत आहे का. जेणेकरून जातीगणनेत पारदर्शकता आणता येईल. यासोबतच, जयराम यांनी पंतप्रधान मोदींना सायप्रस दौऱ्यावरून अदाणी प्रकरणात कोंडीत पकडले आणि म्हटले की मोदाणी घोटाळ्याशी संबंधित एक प्रमुख व्यक्ती सायनसचा नागरिक आहे हा केवळ योगायोग आहे. यासोबतच, अहमदाबाद विमान अपघातावरून ते म्हणाले की, विमान वाहतूक क्षेत्रात सुरक्षेला प्राधान्य न देण्यात मोदी सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी जनगणनेबाबत सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भाष्य करताना जयराम रमेश म्हणाले की, दीर्घ प्रतीक्षेनंतर, १६ व्या जनगणनेची बहुचर्चित अधिसूचना अखेर जारी करण्यात आली आहे. पण हे उंदीर शोधण्यासाठी डोंगर खोदण्यासारखे आहे.

कारण त्यात ३० एप्रिल २०२५ रोजी आधीच जाहीर केलेल्या गोष्टींचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. वास्तव असे आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सततच्यामागणी आणि दबावामुळे पंतप्रधानांना जातीय जनगणनेच्या मागणीपुढे झुकावे लागले. त्यांनी या मागणीसाठी काँग्रेस नेत्यांना शहरी नक्षलवादी देखील म्हटले होते. संसद असो वा सर्वोच्च न्यायालय, मोदी सरकारने जातीय जनगणनेचा विचार पूर्णपणे नाकारला होता. अगदी ४७ दिवसांपूर्वी सरकारनेच त्याची घोषणा केली. तथापि, राजपत्र अधिसूचनेत जातीय जनगणनेचा उल्लेख नाही. तर हा पुन्हा तोच यू-टर्न आहे का, ज्यासाठी पंतप्रधान मोदी कुप्रसिद्ध आहेत? की भविष्यात त्याचे तपशील बाहेर येतील?

तेलंगणा मॉडेल स्वीकारले पाहिजे

रमेश म्हणाले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे स्पष्ट मत आहे की, १६ व्या जनगणनेत तेलंगणा मॉडेल स्वीकारले पाहिजे. म्हणजेच केवळ जातींची मोजणीच नाही तर जातीनिहाय सामाजिक आणि आर्थिक स्थितीशी संबंधित तपशीलवार माहिती देखील गोळा केली पाहिजे. तेलंगणाच्या जात सर्वेक्षणात ५६ प्रश्न विचारण्यात आले. आता प्रश्न असा आहे की. ५६ इंचाची छाती असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीकडे १६ व्या जनगणनेतही ५६ प्रश्न विचारण्याची समज आणि धाडस आहे का?

Sudhakar Badgujar : ह्याचा आज खऱ्या अर्थाने “पोपट झाला रे…”; संजय राऊतांनी नितेश राणेंना पुन्हा डिवचले

अदाणींवर साधला निशाणा

यासोबतच जयराम रमेश यांनी पंतप्रधानांच्या सायप्रस दौऱ्यावरही निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी कॅनडाला जात असताना सायप्रसमध्ये असल्याचे जयराम म्हणाले, मोदाणी घोटाळ्याशी संबंधित एक प्रमुख व्यक्ती सायप्रसची नागरिक आहे हा केवळ योगायोग आहे. यासोबतच सायप्रसच्या स्वातंत्र्याबद्दल आणि तत्कालीन काँग्रेस सरकार आणि माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या सायप्रसशी असलेल्या संबंधांबद्दल बोलताना जयराम रमेश म्हणाले की, १९५० च्या दशकात सायप्रसच्या स्वातंत्र्याला भारताने दिलेल्या पाठिंब्यामुळे तुर्कीसोबतचे आपले द्विपक्षीय संबंध बिघडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हे लक्षात ठेवले पाहिजे. आजच्या भू-राजकीय परिस्थितीच्या संदर्भात हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

विमान सुरक्षेत निष्काळजीपणा

नागरी विमान वाहतुकीच्या सुरक्षेतील निष्काळजीपणावरून जयराम रमेश यांनी सरकारला घेरले, जयराम म्हणाले की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याचे अहवालांवरून स्पष्ट होते. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयात ५३% पदे रिक्त आहेत, तर नागरी विमान वाहतूक सुरक्षा व्युरोमध्ये ३५% पदे आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणात १७% पदे रिक्त आहेत.

जेव्हा विमान वाहतूक सुरक्षा, तपासणी, नियमन आणि ऑपरेशन्सशी संबंधित प्रमुख विभाग निम्म्याहून कमी कर्मचाऱ्यांसह काम करत आहेत, तेव्हा सुरक्षित उहाणे कशी सुनिश्चित केली जातील. अहमदाबादमधील विमान अपघाताच्या चौकशी अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत, परंतु संसदीय समितीच्या अहवालानंतरही कारवाई न होणे ही गंभीर बाब आहे. आम्ही सरकारला यावर परिस्थिती स्पष्ट करण्याची आणि आवश्यक पावले उचलण्याची मागणी करतो.

Web Title: Congress attack on modi govt on caste census cyprus visit in ahmedabad plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 10:06 PM

Topics:  

  • Ahmedabad plane crash
  • Caste Census
  • Congress

संबंधित बातम्या

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
1

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
2

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
3

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा
4

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.