बेंगळुरू : विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापले आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचाराला वेग दिला आहे. पक्षाचे नेते सातत्याने रोड शो आणि जाहीर सभांना संबोधित करून जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी व्यक्त केला. यासोबतच महाविकास आघाडी महाराष्ट्रात 165 ते 170 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा अंदाज त्यांनी शनिवारी व्यक्त केला.
डीके शिवकुमार म्हणाले, “आम्ही 165 ते 170 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत. महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल. पण भाजपने कायम जनतेची दिशाभूल केली आहे. आम्ही आमच्या हमीभावाची अंमलबजावणी केली नाही, मात्र आम्ही जनतेला आश्वासन दिले, आम्ही पत्रकार परिषद घेतली. आता लोकांना माहित आहे की आम्ही सर्व आश्वासनांची अंमलबजावणी केली आहे. कर्नाटकचे शासन मॉडेल, ज्यामध्ये महागाई रोखण्यासाठी उपाययोजनांचा समावेश आहे, त्याचे देशभर पालन केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले.
डीके शिवकुमार म्हणाले, “संपूर्ण देश कर्नाटक मॉडेलचा अवलंब करत आहे. मला खूप आनंद होत आहे की किमान आता तरी महागाईचा देशातील सर्वसामान्यांवर परिणाम होत आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. शिवकुमार यांनी वक्फ जमिनीच्या मुद्द्यावरही भाष्य केले आणि काँग्रेस सरकार कोणत्याही शेतकऱ्याची जमीन घेतली नाही.
“भाजपच्या काळात सुरू झाल्याच्या सर्व नोंदी आमच्याकडे आहेत. पण माझ्या मुख्यमंत्र्यांनी आणि माझ्या मंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की कोणत्याही शेतकऱ्याची जमीन घेतली जाणार नाही. पण भाजपकडून वारंवार संभ्रम निर्माण केला जात आहे. भाजपकडून सातत्याने ‘जातीय तणाव’ भडकवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी यावेली केली. तसेच, तुम्ही लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे, जातीय संघर्ष भडकावला जात आहे. पण आमच्याकडे सर्व नोंदी आहे. ही भाजपची सुरूवात आहे. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
मुंबई पोलीस: महाराष्ट्र निवडणूक 2024: खजिन्याने’ भरलेला ट्रक, 80 कोटींची चांदी; मुंबई पोलिसांच्या हाती घबाड