Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Breaking: राहुल गांधी PM मोदींच्या भेटीला; पाकिस्तानबाबत अंतिम निर्णय होणार?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. भारताने अनेक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 05, 2025 | 07:06 PM
Big Breaking: राहुल गांधी PM मोदींच्या भेटीला; पाकिस्तानबाबत अंतिम निर्णय होणार?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. भारताने अनेक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. त्यातच आता पाहलगं हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीत महत्वाच्या घटना घडत आहेत. रोज महत्वाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी पीएमओ ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत.

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पहलगाम हल्ल्याविषयी चर्चा होणार की अन्य कोणत्या विषयांवर ते काही वेळाने स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

भारताची पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक

 पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. सिंधू जल करार स्थगित केल्यापासून पाकिस्तानची बोबडी वळली आहे. वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. व्यापार बंद करण्यात आला आहे. मात्र आता भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केली आहे. भारताने चिनाब नदीचे पाकिस्तानकडे जाणारे पाणी बंद केले आहे. बगलिहार धंरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

पहलगाम हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. भारताने कोणतीही सैन्य कारवाई न करता पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तान चवताळला आहे. भारताने आता वॉटर स्ट्राईक करत चिनाब नदीवर असलेले बगलिहार धरणाचे पाणी अडवले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अनेक भागात पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.

भारताची पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक’; ‘चिनाब’वरील बगलिहार डॅमचे दरवाजे बंद, शत्रूराष्ट्राची पाण्यासाठी वणवण

चिनाब नदीचे पाणी अडवल्याने पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतात पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानची अडचण होणार आहे. जर का भारताने झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचे देखील दरवाजे बंद केले तर पाकिस्तानचे पाण्याविना हाल होणार आहेत.

बगलिहार डॅम बंद करण्याचा फायदा भारतालाच

पहलगाम हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. तसेच चिनाब नदीचे पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी अडवले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे हाल होणार आहेत. मात्र पाणी अडवण्याचा फायदा भारतालाच होणार आहे. बगलिहार धनर चिनाब नदीवर आहे. जे भारतासाठी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. धरणाचे दरवाजे बंद करण्याचा फायदा भारताला होणार आहे. यामुळे जम्मू-काश्मीर मधील विजेचे उत्पादन वाढणार आहे. या भागात थंडीच्या काळामध्ये विजेचा तुटवडा निर्माण होतो. मात्र आता संपूर्ण पाणी भारत वापरणार असल्याने या ठिकाणी विजेचा तुटवडा निर्माण होणार नाही.

 

Web Title: Mp rahul gandhi meet to pm narendra modi pmo office new delhi pahalgam terror attack news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 06:55 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

राहुल गांधी बनले राम; कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमा देऊन केला सन्मान की अपमान?
1

राहुल गांधी बनले राम; कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमा देऊन केला सन्मान की अपमान?

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?
2

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

Karnatak News: EVMवर जनतेचा प्रचंड विश्वास; कर्नाटक काँग्रेस सरकारच्या सर्वेक्षणातून निष्कर्ष, भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल
3

Karnatak News: EVMवर जनतेचा प्रचंड विश्वास; कर्नाटक काँग्रेस सरकारच्या सर्वेक्षणातून निष्कर्ष, भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद
4

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.