भारताने रोखले चिनाब नदीचे पाणी (फोटो -सोशल मिडिया)
श्रीनगर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. सिंधू जल करार स्थगित केल्यापासून पाकिस्तानची बोबडी वळली आहे. वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. व्यापार बंद करण्यात आला आहे. मात्र आता भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केली आहे. भारताने चिनाब नदीचे पाकिस्तानकडे जाणारे पाणी बंद केले आहे. बगलिहार धंरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
पहलगाम हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. भारताने कोणतीही सैन्य कारवाई न करता पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तान चवताळला आहे. भारताने आता वॉटर स्ट्राईक करत चिनाब नदीवर असलेले बगलिहार धरणाचे पाणी अडवले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अनेक भागात पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.
चिनाब नदीचे पाणी अडवल्याने पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतात पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानची अडचण होणार आहे. जर का भारताने झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचे देखील दरवाजे बंद केले तर पाकिस्तानचे पाण्याविना हाल होणार आहेत.
बगलिहार डॅम बंद करण्याचा फायदा भारतालाच
पहलगाम हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. तसेच चिनाब नदीचे पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी अडवले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे हाल होणार आहेत. मात्र पाणी अडवण्याचा फायदा भारतालाच होणार आहे. बगलिहार धनर चिनाब नदीवर आहे. जे भारतासाठी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. धरणाचे दरवाजे बंद करण्याचा फायदा भारताला होणार आहे. यामुळे जम्मू-काश्मीर मधील विजेचे उत्पादन वाढणार आहे. या भागात थंडीच्या काळामध्ये विजेचा तुटवडा निर्माण होतो. मात्र आता संपूर्ण पाणी भारत वापरणार असल्याने या ठिकाणी विजेचा तुटवडा निर्माण होणार नाही.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेत? चेन्नईतून कोलंबोत अलर्ट; फ्लाईटला सुरक्षा दलांचा वेढा
चिनाब नदीचे पाणी अडवल्याचा परिणाम थेट पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध भागात होणार आहे. शेतीस पाणी न मिळाल्यास या भागात अन्न-धान्य मिळण्यास अडचण होऊ शकते. तसेच भारताने झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचे दरवाजे बंद केले तर, पाकिस्तानची स्थिती अजून गंभीर होऊ शकते. शेती, वीज निर्मिती आणि अन्य गोष्टींवर याचा परिणाम पाकिस्तानला सहन करावा लागू शकतो.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेत?
पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान पहालगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेत पळून गेल्याचे म्हटले जात आहे. कारण, श्रीलंका एअरलाइन्सची फ्लाईट कोलंबो एअरपोर्टवर लँड होताच सुरक्षा दलांनी विमानाला वेढा घातला. तसेच सुरक्षा दलांनी विमानाच्या आत जाऊन देखील सर्च ऑपरेशन राबवले.