
Nitin Nabin hits back at Mallikarjun Kharge for criticizing the BJP and RSS
Congress vs BJP : आसाम : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम होत आहे. यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला असून राजकीय आरोप सुरु आहेत. या निवडणुकांच्या प्रचारामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे.काँग्रेसने भाजप आणि भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसवर (RSS) निशाणा साधला आहे. यावरुन भाजप अध्यक्ष नितीन नबीन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये राजकीय वाद सुरु आहे.
निवडणुकांच्या प्रचार काळात राजकारण्यांची भाषा अनेकदा कठोर होते, पण कधीकधी ती सभ्यतेची मर्यादा ओलांडते. आसामसारख्या निवडणुकीच्या रणभूमीतून बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर निशाणा साधला. खरगे यांनी भाजप आणि आरएसएसला ‘विषारी साप’ संबोधल्याने राजकीय वर्तुळात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपने या वक्तव्याला त्वरित प्रत्युत्तर दिले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर थेट हल्ला चढवत म्हटले की, ते एक सज्जन व्यक्ती होते अशी असभ्य भाषा कधीही वापरत नव्हते.
हे देखील वाचा : निवडणूक आयोगाचा मतता दीदींना दणका; तृणमूल कॉंग्रेसला दिला अंतिम इशारा
भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी आरोप केला आहे की, “मल्लिकार्जुन खरगे यांच्या तोंडून निघणारे शब्द खरे तर गांधी घराण्याचे आहेत. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, राहुल गांधी आणि सोनिया गांधी रिमोट कंट्रोलद्वारे काँग्रेस नेत्यांना नियंत्रित करत आहेत. भाजपचा विश्वास आहे की, खरगे यांना या गोष्टी शिकवल्या गेल्या आहेत आणि वरिष्ठ नेतृत्वाने दिलेल्या सूचनांनुसारच ते बोलत आहे,” अशी टीका नितीन नबीन यांनी केली आहे.
हे देखील वाचा : मोदी फुसका बार निघाले, 12 वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशात लुट सुरु; हर्षवर्धन सपकाळांची टीका
भाजप आणि काँग्रेसमधील हा वाद केवळ वक्तव्यांपुरता मर्यादित राहिला नाही, तर आता तो कायदेशीर गुंतागुंतीत अडकला आहे. केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपच्या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, खर्गे यांची वक्तव्ये निवडणूक प्रचाराच्या नियमांचे उल्लंघन करतात आणि लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
पक्षाने एफआयआर दाखल करून योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, जेव्हा जेव्हा काँग्रेसने अशी कठोर भाषा वापरली आहे, तेव्हा जनतेने अनेकदा भाजपलाच मतदान केले आहे. त्यामुळे, या कायदेशीर लढाईचा अंतिम निवडणुकीच्या निकालांवर काय परिणाम होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.