
इराण-इस्त्रायल युद्धावर मोदींचे भाष्य
राज्यसभेत पंतप्रधान मोदी यांनी दिली माहिती
युद्धामुळे अनेक भारतीय जहाजे अडकली – मोदी
Iran -Israel War: सध्या इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारताला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेलसाठा, गॅसचा पुरवठा यावर परिणाम झाला आहे. दरम्यान आज राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत देशातील नागरिकांना माहिती दिली. अनेक भारतीय जहाजे युद्धामुळे अडकली असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी संसदेत नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आम्ही गल्फमधील देशांच्या संपर्कात आहोत. आम्ही इराण, इस्त्रायलो आणि अमेरिकेशी संपर्कात आहे. संवाद होऊन यावर तोडगा निघावा हाच यांचा प्रयत्न आहे. आतापर्यंत 3 लाख 75 हजार भारतीय आखाती देशांमधून भारतात परतले आहेत. जगभरात गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे.”
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. संकटकाळात सरकार संवेदनशील आहे. होमुर्झ सामुद्रधुनीमधून मोठ्या प्रमाणात गॅस, तेलाचा पुरवठा होतो. सर्व देशांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. हल्ल्यांमध्ये काही भारतीयांचा मृत्यू झाला आहे तर काही जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार केले जात आहे.”
“जिथून तेल आणि गॅस भारतात आणता येईल त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. हे आमचे प्रयत्न शेवटपर्यंत सुरू राहतील. युद्ध दीर्घकाळ चालल्यास मोठे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. इराणमधून 1 हजारपेक्षा जास्त भारतीय मायदेशी परतले आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
PM Modi नी लोकसभेत मांडली रणनीती
जगाच्या पाठीवर कुठेही संकट आले की, भारताचे ‘संकटमोचक’ धोरण पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मध्य-पूर्वेत इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या २४ दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जग एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत देशाला संबोधित करताना भारतीयांच्या सुरक्षिततेबाबत सर्वात मोठा अपडेट दिला आहे. “युद्धग्रस्त भागातून आतापर्यंत ३ लाख ७५ हजार भारतीयांना आम्ही सुखरूप बाहेर काढले आहे,” असे सांगत पंतप्रधानांनी भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली.
पंतप्रधान मोदींनी नमूद केले की, केवळ जमिनीवरच नाही तर समुद्रातही अनेक भारतीय कर्मचारी जहाजांवर अडकले आहेत. “आखाती देशांमध्ये जवळपास १ कोटी भारतीय काम करतात. त्यांच्या कुटुंबांची चिंता ही माझी वैयक्तिक चिंता आहे,” अशा शब्दांत मोदींनी आपले भावनिक नाते स्पष्ट केले.