
Prakash Ambedkar
अरुणाचल प्रदेशातील ताक्तसिंग (Taktsing) सीमावर्ती भागात चीनने भारताची जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. बुधवारी (८ जुलै) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी हा मुद्दा सरकारसमोर ठामपणे मांडणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारत अमेरिकेशी आंधळेपणाने करार करत असून त्याचवेळी अरुणाचल प्रदेशातील ताक्तसिंग भागात चीनने भारताच्या ताब्यातील जमीन बळकावली आहे. २०२० पर्यंत भारतीयांच्या ताब्यात असलेल्या या भागात आता भारतीय नागरिकांनाही प्रवेश करता येत नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अरुणाचल प्रदेशातील Nah Welfare Society या संस्थेने २६ जून २०२६ रोजी सुबनसिरी जिल्ह्याच्या उपायुक्तांना पत्र लिहून चीनच्या कथित घुसखोरीचा तपशील दिला आहे.
‘हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले’; मिसिंग लिंकवरील टीकेला फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार
प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केला की, या प्रकरणाची माहिती गृह मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाला असूनही दोन्ही मंत्रालयांनी मौन बाळगले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘लाल डोळे दाखवण्याची’ भाषा करतात, मग आता चीनच्या या कथित कारवाईवर सरकार गप्प का आहे?” असा सवाल त्यांनी केला. तसेच चीनने संबंधित भागात लष्करी बंकर आणि हेलिपॅड उभारल्याचाही दावा त्यांनी केला.
भारत जिस तरह अमेरिका से डर रहा है और अमेरिका के साथ अंधाधुंध समझौता कर रहा है। उसी तरह से अरुणाचल प्रदेश के सीमा पर ताकसिंग इलाके में 2020 से जो जमीन भारत के पास थी। अब वहां सब इलाके पर चीन ने कब्जा कर लिया है। वहां पर भारतीय लोग नहीं जा सकते। यह बात अरुणाचल प्रदेश के ताकसिंग की… pic.twitter.com/CoRNAKCsyK — Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) July 8, 2026
प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही प्रश्न विचारला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अरुणाचल प्रदेशातील कथित चिनी घुसखोरीचा मुद्दा प्राधान्याने मांडून सरकारकडून उत्तर मिळेपर्यंत सभागृहाचे कामकाज रोखण्याची भूमिका राहुल गांधी घेणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राम मंदिरातील हिशेबाची SIT कडून पडताळणी; 124 कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
या प्रकरणी भाजप, आरएसएस आणि केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, चीनने भारताची जमीन ताब्यात घेतल्याच्या आरोपांबाबत सरकारने देशाला सत्य सांगितले पाहिजे. तसेच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.