
पंतप्रधान मोदींचे २४ तासांत दुसऱ्यांदा देशवासियांना कळकळीचे आवाहन (Photo Credit- X)
पंतप्रधानांच्या हस्ते वडोदरा येथे १५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सरदारधाम भवन-३ चे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे संकुल आधुनिक शैक्षणिक सुविधांनी सज्ज आहे. “आजचा दिवस माझ्यासाठी ‘पुण्य पर्व’ आहे. सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला ७५ वर्षे पूर्ण होत असतानाच, सरदार पटेल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सरदारधामच्या प्रकल्पाचे लोकार्पण होणे, हा सुवर्णयोग आहे,” असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
VIDEO | Vadodara, Gujarat: PM Narendra Modi (@narendramodi) says, “Today, I am reiterating my appeal in Gujarat as well, and I say this with a sense of right over you. I urge every citizen of the country to reduce the use of petrol and diesel, use the metro, electric buses and… pic.twitter.com/BNuIA0rOUk — Press Trust of India (@PTI_News) May 11, 2026
पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक आर्थिक मंदीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, “सध्या जग एका अस्थिर परिस्थितीतून जात आहे. या घडामोडींचा थेट परिणाम भारतावरही होत आहे. अशा वेळी देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य आवश्यक आहे. विदेशी उत्पादनांवरील अवलंबित्व कमी करून आपण स्वदेशीला ताकद दिली पाहिजे.”
१. सोने खरेदी टाळा: सोन्याच्या आयातीवर देशाचा मोठा परकीय चलन साठा खर्च होतो. त्यामुळे सद्यस्थितीत सोने खरेदी लांबणीवर टाकावी.
२. इंधन बचत: पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि ‘कारपूलिंग’चा वापर करावा.
३. डिजिटल क्रांती: प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचवण्यासाठी व्हर्च्युअल मीटिंग्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वापर करावा.
४. वोकल फॉर लोकल: स्थानिक उद्योजकांना बळ देण्यासाठी भारतीय बनावटीच्या वस्तूच खरेदी कराव्यात.
५. शेतीमध्ये बदल: खतांचा (फर्टिलायझर) वापर मर्यादित करून नैसर्गिक शेतीकडे वळावे.
गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील विजयाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी जनतेचे आभार मानले. “आज देशातील छोटे शहर आणि गावातील तरुण स्टार्टअप्सच्या माध्यमातून नाव कमावत आहेत. मुद्रा योजना, आयुष्मान भारत आणि नळ से जल यांसारख्या योजनांमुळे महिलांची शक्ती वाढत आहे. महिलांचा वाढता सहभाग हेच भारताच्या विकासाचे खरे इंजिन आहे,” असे गौरवद्गार त्यांनी काढले. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर आता देशातील नागरिक आणि विशेषतः सुवर्ण बाजारात काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेने ‘स्वदेशी’ला लोकचळवळ बनवावे, असे आवाहन करत त्यांनी भाषणाचा समारोप केला.