
Rahul Gandhi discusses no-confidence motion against Lok Sabha Speaker Om Birla
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये अविश्वास ठरावर चर्चा केली. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी ओम बिरला यांची बाजू घेऊन विरोधकांना खडेबोल सुनावले. सत्ताधारी गटाकडून रवी शंकर यांनी भूमिका मांडली. या चर्चेवेळी राहुल गांधी यांनी ओम बिरला यांच्या विरोधात आक्षेप मांडले आहेत. यावर रवीशंकर यांनी सडेतोड उत्तर दिले. मात्र या चर्चेमध्ये देखील राहुल गांधींना बोलू दिले जात नसल्याचे म्हणत विरोधकांनी सभागृहामध्ये गदारोळ घातला.
हे देखील वाचा : इच्छामरण म्हणजे काय? 13 वर्षांपासून कोमात असणाऱ्या हरीश राणाची ‘मृत्यूची इच्छा’ कशी पूर्ण होणार?
अविश्वास ठरावावर चर्चा करताना राहुल गांधी म्हणाले की, “सभागृहामध्ये अनेकदा मला बोलताना रोखण्यात आले. मला बोलू दिले जात नाही. मला बोलण्यापासून रोखलं जातं. तसेच या सभागृहामध्ये अनेकदा चर्चा होती ही एक लोकशाही पद्धत आहे. आणि अध्यक्षांच्या नियमांप्रमाणेच चर्चा केली जाते. अनेकदा माझे नाव या सभागृहामध्ये घेतले जाते. ज्यावेळी माझ्याबाबत या ठिकाणी अनेक गोष्टी बोलल्या जातात. हे सदन भारतीय जनतेच्या आणि नागरिकांचे प्रतिक आहे. हे सदन कोणत्याही एका पार्टीचे प्रदर्शन करत नाही. हे पूर्ण देशाचे अभिव्यक्ती आहे,” अशा भावना राहुल गांधींनी व्यक्त केल्या.
हे देखील वाचा : तेल अन् गॅस संकटात सरकारचा प्लॅन B! देश वाचवण्यासाठी मोदी सरकारची मोठी रणनीती
पुढे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, “जेव्हा जेव्हा मी बोलण्यासाठी उठतो तेव्हा तेव्हा मला बोलण्यापासून रोखले जाते. असे एकदा नाही तर अनेकदा झाले आहे. मागच्या वेळी जेव्हा मी बोलण्यास सुरुवात केली तेव्हा मी खूप मुलभूत प्रश्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेल्या तडजोडी आणि करार आहेत याबाबत मी प्रश्न केला होता. मला बोलू दिले जात नाही,” अशी स्पष्ट भूमिका राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.
माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या “फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकावरुन लोकसभेमध्ये वाद निर्माण झाला आहे. यापूर्वी देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात याच पुस्तकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाला होता. यावेळी विरोधकांना बोलू न दिल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. यावर चर्चा सुरु असताना राहुल गांधींनी पुन्हा एकदा हे पुस्तक दाखवले आहे. यावर रवीशंकर यांनी नकार दर्शवला.