'तर सत्तेत परत येणं अवघड...', काँग्रेसबाबत शशी थरुर यांचं पुन्हा मोठं विधान
शशी थरूर गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसच्या भूमिकेवर सातत्याने प्रहार करत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केरळमधील एलडीएफच्या सरकारचं कौतुक करताना दिसत आहेत. त्यामुळे ते कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान त्यांनी आज पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या भवितव्यावर भाष्य केलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसने चांगल प्रदर्शन केले, पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला मोठं अपयश आलं. त्यावरून थरूर यांनी महत्त्वाची टिप्पणी केली आहे.
BJP Video : भाजप मुख्यालयात तुफान राडा; प्रदेशाध्यक्षांसमोरच पक्षाचे नेते भिडले, Video व्हायरल
शशी थरुर म्हणतात की, तुम्हाला देशात बदल घडवून आणायचा असेल, तर एकटे लढून चालणार नाही, तर इतर पक्षांना सोबत घ्यावे लागेल. यूपी आणि बिहारमध्ये आम्ही आघाडी करुनच पुढे जाऊ शकतो. दिल्लीत पक्ष तीन वेळा सत्तेबाहेर असल्याने दिल्लीत पुनरागमन कठीण आहे. कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्षाचा उल्लेख करत थरुर म्हणतात, काँग्रेस आज प्रत्येक राज्यात एक-दोन जागावर आहे, मात्र इतर पक्ष केवळ एक दोन राज्यांपुरते मर्यादित आहेत.
अशी अनेक राज्ये आहेत, जिथे काँग्रेस आघाडी करुनच पुढे जाऊ शकते. उदाहरणार्थ, काँग्रेस 1996 पर्यंत यूपीमध्ये स्वबळावर सत्तेत होती आणि सरकारही चालवले, पण आता त्याची शक्यता फारच कमी आहे. समाजवादी पक्ष किंवा इतर कोणत्याही पक्षाशी युती करूनच आपण पुढे जाऊ शकतो. बिहारमध्येही तेच आहे. तमिळनाडूतही आमची द्रमुकसोबत आघाडी आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याची कहाणी वेगळी आहे.
Bird Flu : मांजर पाळताय तर सावधान! कावळ्यानंतर आता पाळीव मांजरीमध्ये आढळली बर्ड फ्लूची लक्षणं
कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेस जी ताकद दाखवू शकते, ती पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये दाखवू शकणार नाही, पण आम्ही वेगळ्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. देशात बदल घडवून आणायचा असेल, तर प्रत्येकवेळी स्वबळावर लढण्याची गरज नाही. एकाच विचारधारेच्या इतर पक्षांसोबत पुढे जाता येऊ शकते, असे सूचक विधानही त्यांनी केले. यावरुन आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस स्थानिक पक्षांशी हातमिळवणी करणार असल्याचे बोलले जात आहे.