• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Social Media Platform Can Say Soon There Will Be Breakup

जाणून घ्या का होतो ब्रेक अप? ब्रेक अपच्या या 6 कारणांपासून राहा सावध, अन्यथा ‘व्हॅलेटाईन डे’साठी घेतलेली महागडी गिफ्ट जातील वाया..

प्रेम विचारपूर्वक केले जात नाही. तुम्ही कोणाच्या प्रेमात पडाल आणि कधी पडाल याचा नेम नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आणि शुभ वेळ असू शकत नाही, परंतु ब्रेकअपची वेळ ठरलेली असते. व्हॅलेंटाईन डे व्यतिरिक्त, भारतात ब्रेकअप कॉलेजमधील नवीन सत्राच्या सुरुवातीला, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नाच्या हंगामात होतात.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 30, 2023 | 09:12 AM
जाणून घ्या का होतो ब्रेक अप? ब्रेक अपच्या या 6 कारणांपासून राहा सावध, अन्यथा ‘व्हॅलेटाईन डे’साठी घेतलेली महागडी गिफ्ट जातील वाया..
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली : चेन्नईमध्ये एका 29 वर्षीय डॉक्टरचा ब्रेकअप झाला होता. यामुळे तो डिप्रेशनमध्ये होता. नैराश्याचा सामना करण्यासाठी तो डिप्रेशनवर उपचार घेत होता. असे असूनही तो आपल्या मैत्रिणीला विसरू शकला नाही. त्याने स्वतःला मर्सिडीजमध्ये बंद करून आग लावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुरामुळे त्याला गुदमरायला लागल्यावर तो कारमधून बाहेर आला. मर्सिडीज जळून राख झाली. ब्रेकअपनंतर आत्महत्येचा प्रयत्न करणे भ्याडपणाचे आहे.

व्हॅलेंटाईन डे येणार आहे. नवीन नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आणि जुने मजबूत करण्यासाठी हीच वेळ असते मात्र कधीधी नाते तुटतात ब्रेकअप होतो. आता ब्रेकअपबाबत सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, तुमचे सोशल मीडिया अकाउंट सहजपणे सांगू शकतात की तुमचे ब्रेकअप होईल की नाही.

प्रश्न: तुमच्या जोडीदाराला तुमच्यासोबत ब्रेकअप करायचे आहे हे तुम्हाला सोशल मीडियावरून कसे कळेल?

उत्तर: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटने एका विषयावर सर्वेक्षण केले. यात सुमारे सात हजार लोक सहभागी झाले होते. सोशल मीडिया फीड म्हणजेच पोस्ट्सच्या माध्यमातून सामाजिक, भावनिक आणि आकलनाच्या आधारे या लोकांच्या जीवनाचा मागोवा घेण्यात आला. या आधारावर असे आढळून आले की, फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी सारखे कोणतेही सोशल मीडिया खाते सहजपणे सांगू शकते की येत्या तीन महिन्यांत एखादी व्यक्ती त्याच्या जोडीदाराशी ब्रेकअप करणार आहे.

सर्व्हेमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, याविषयी आधीच जाणून घेतल्याचा एक फायदा म्हणजे ब्रेकअपनंतर डिप्रेशन, टेन्शन यासारख्या मानसिक परिणामांपासून व्यक्तीला वाचू शकतो.

सोशल मीडिया अकाऊंट पाहून तुम्हाला अशा प्रकारे कळू शकते की ब्रेकअप होणार आहे.

सोशल मीडिया पोस्ट लिहिण्याची पद्धत बदलते.
व्यक्ती ‘मी’ किंवा ‘मला’ सारखे शब्द वापरू लागते.
जोडीदाराच्या फोटोंवर कमेंट करणे थांबवते.
जर जोडीदाराने त्याला टॅग करून एखाद्या गोष्टीशी सहमती देण्याचा प्रयत्न केला तर त्या बदल्यात तो ‘कदाचित’ किंवा ‘विचार करेन’ अशा शब्दांनी उत्तर देतो.
ती व्यक्ती सोशल मीडियावर जोडप्याचे फोटो पोस्ट करणे थांबवते.
फोटोमध्ये त्याचे भविष्य आणि स्वप्ने दाखवण्याचा प्रयत्न करतो.
प्रश्नः तुमच्या जोडीदाराच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे सर्व दिसत असेल तर आपण आपला मार्ग बदलायला हवा का?

उत्तर: तसे नाही. माहिती न देता मार्ग बदलणे हा उपाय नाही. तुम्ही काही चोरी केलेली नाही. त्याबद्दल समोरासमोर बोला. आपल्या जोडीदाराशी कन्फर्म करा की तो त्याच्या नात्याबद्दल गंभीर तर नाही. तसे असेल तर दोघांनी सहमतीने ब्रेकअप केले पाहिजे.

सहमतीने ब्रेकअपचे हे 4 फायदे आहेत

ब्रेकअप नंतर तुम्ही डिप्रेशनला बळी पडणार नाही.
नात्याबाबत तुमच्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत.
तुम्ही तुमच्या जुन्या जोडीदाराबद्दल वाईट वाटत विचार करत नाही, मैत्री कायम राहते.
प्रश्न: ब्रेकअप झाल्यानंतरही मी माझ्या एक्ससोबत मैत्री ठेवू शकतो का?

उत्तरः ब्रेकअपनंतर मैत्री ठेवावी की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुमचे नाते खूप जुने असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही भविष्यात चांगले मित्र राहू शकाल तर काही हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रीचा हात दोन्ही बाजूंनी असायला पाहिजे. एकतर्फी मैत्री फक्त तुम्हाला त्रास देईल. तुमचे हृदय पुन्हा एकदा तुटेल.

प्रश्न: हृदय खरोखर तुटते का? जर होय, तर का?

उत्तर: आपण अनेकदा म्हणतो की हृदय तुटण्याचा आवाज येत नाही. यावर कोणीही असे म्हणू शकतो की हृदय हे काचेचे असते, जे तुटल्यावर आवाजही येईल. वस्तुस्थिती अशी आहे की हृदय केवळ कवीच्या कल्पनेत तुटत नाही. ते खरोखरच तुटते. याला ताकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी म्हणजेच ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणतात. हेच ब्रेकअपचेही कारण ठरते.

ब्रोकन हार्ट सिंड्रोमला ताकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी का म्हणतात?

ताकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी एक जपानी शब्द आहे.
या सिंड्रोममध्ये, स्नायू सैल होतात.
हृदयाचा आकार जपानमधील मच्छिमार ऑक्टोपस पकडण्यासाठी वापरणाऱ्या जाळ्यासारखा होतो.
या जाळ्याला जपानी भाषेत ताकोत्सुबो म्हणतात. त्यावरून ब्रोक हार्ट सिंड्रोमचे नाव ‘ताकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी’ झाले.
योग्य वेळ पाहून ब्रेकअप होतो

प्रेम विचारपूर्वक केले जात नाही. तुम्ही कोणाच्या प्रेमात पडाल आणि कधी पडाल याचा नेम नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी भलेही योग्य वेळ आणि मुहूर्त नसेल, पण ब्रेकअपची वेळ ठरलेली असते. भारतात ब्रेकअप व्हॅलेंटाईन डे व्यतिरिक्त, कॉलेजमधील नवीन सत्राच्या सुरुवातीला, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नाच्या हंगामात होतात. ही तिच वेळ आहे जेव्हा नवीन लोक भेटतात आणि नवीन नातेसंबंध तयार होतात. त्याच वेळी, ख्रिसमसच्या दरम्यान परदेशात सर्वाधिक ब्रेकअप होतात.

प्रश्न: व्हॅलेंटाईन डेच्या आसपास ब्रेकअप्स का होतात?

उत्तरः अतिशय साधे कारण आहे. हीच वेळ असते जेव्हा प्रेमी ब्रेकअप करून वर्षभराचा राग काढतात. कोणी कोणाचे चांगले केले आणि कोणाचे वाईट केले, हे देखील भेटवस्तूवरून ठरते. म्हणूनच काही लोकांना परिपूर्ण भेटवस्तू काय द्यायची यावर देखील परिणाम होतो. जर दोघांपैकी एकाला वाटले की भेट त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे, तर ब्रेकअप निश्चित आहे.

व्हॅलेंटाइनच्या वेळी नियोजित ब्रेकअप देखील केले जातात. जिथे लोक नवीन नात्यासाठी जुनी नाती तोडतात.

प्रश्न: ब्रेकअपनंतर लव्ह हार्मोनचे काय होते?

उत्तरः मिशिगन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर इथान क्रॉस यांच्या संशोधनानुसार, लव्ह हार्मोनचा प्रवाह थांबतो. वास्तविक ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन हे आपल्या शरीरातील दोन लव्ह हार्मोन्स आहेत. ब्रेकअप झाल्यानंतर या दोन्ही हार्मोन्सचा प्रवाह थांबतो. यानंतर, एपिनेफ्रिन आणि कार्टिसोल हार्मोन्स मेंदूमध्ये सोडले जातात. या दोन्ही हार्मोन्सना स्ट्रेस हार्मोन्स म्हणतात. स्ट्रेस हार्मोन्समुळे स्नायूंना रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे स्नायूंमध्ये तणाव निर्माण होतो. अॅक्शन हार्मोन्स सक्रिय असतात आणि एखादी व्यक्ती रागाच्या भरात चुकीची पावले उचलू शकते.

प्रश्न: मी कुठेतरी वाचले की हिंदी पट्ट्यातील लोकांचे ह्रदय सर्वात जास्त तुटते, जर ते खरे असेल तर असे का?

उत्तरः ब्रेकअप हेल्पलाइनचे संस्थापक अनुभव म्हणतात की, गुजरात, नागालँड, कर्नाटकमधील लोकांपेक्षा राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील तरुणांचे ब्रेकअपचे प्रमाण जास्त आहे. येथील ग्रामीण भागातून आम्हाला सर्वाधिक फोन येतात. ब्रेकअपचे कारण कधीकधी क्षुल्लक असते. कधी दुसरी व्यक्ती आवडायला लागते, तर कधी महागडे गिफ्ट हवे असते आणि मुलगा ते देऊ शकत नाही. गावातील लोक आजही निरागस आहेत, ज्याच्या प्रेमात एकदा पडले त्याच्यासोबत आयुष्यभर घालवायची इच्छा असते. अशा परिस्थितीत ब्रेकअप झाल्यानंतर हृदय तुटते. अनेक दिवस ते डिप्रेशनमध्ये राहतात. सुशिक्षित राज्यांमध्ये ‘मूव्ह ऑन’चा ट्रेंड आहे. एकदा हृदय तुटले की काही दिवसांनी दुसऱ्यावरही येते. या लोकांसाठी प्रेमाइतकेच करिअर महत्त्वाचे आहे.

ब्रेकअप हेल्पलाइन अहवाल काय सांगतो?

व्हॅलेंटाईन विरोधी आठवड्यात सर्वाधिक फोन कॉल ब्रेकअप हेल्पलाइनवर येतात.
दिल्ली, गुडगाव, नोएडा, लखनौ, कानपूर, जयपूर, भोपाळ आणि जबलपूर येथील तरुण सर्वाधिक कॉल करतात.
ग्राहकांचे वय 24 ते 32 वर्षे दरम्यान आहे
फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि स्काईपवरही लोकांचे ब्रेकअप होते. स्रोत- ब्रेकअप हेल्पलाइन
जाता-जाता

हृदय तुटण्याचे दुसरे कारण जाणून घ्या

एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू
पैशाचे नुकसान
नात्यात फसवणूक
बराच काळ आजारी असणे
व्यासपीठावर बोलण्याची भीती
अचानक वाईट बातमी ऐकणे

Web Title: Social media platform can say soon there will be breakup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2023 | 09:07 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.