Photo Credit- Social Media शेतकरी होईल मालमाल; गहू-ज्वारी नव्हे तर 'हे'पीक देईल सर्वाधिक नफा
Rajma Farming: कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर सध्या देशभरातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. एकेकाळी खडकाळ आणि मुरूम असलेल्या जमिनीतही अंकूर फुटू लागले आहेत. खडकाळ जमिनीत शेतीपिक घेऊ शेतकरी ही खडकाळ जमिनीलाही समृद्धीचे स्रोत बनवले आहे. देशभरातील शेतकरी वेगवेगळी पारंपरिक पिके घेत असतानाच या पारंपरिक पिकांना आता पर्यायही मिळू लागले आहेत. यातलाच एक पर्याय म्हणजे राजमा. पारंपरिक पीक घेण्यासोबतच शेतकरी आता राजमा पिकाची लागवड करून समृद्धीच्या दिशेने जाऊ लागले आहेत.
शेतकरी पारंपारिक शेतीला एक नवीन दिशा देऊ लागले आहेत. बाजारात राजमालाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांची स्वावलंबनाकडे वाटचाल करू लागले आहेत. म्हणूनच शेतकऱ्याचा आता इतर पिकांसह राजमा लागवड वाढवण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य दिशेने केला तर शेतकरी प्रगत शेती करून समृद्ध होऊ शकतात, हेही, शेतकऱ्यांनी सिद्ध केलं आहे.
पूर्वी, गहू, मका आणि भात यांसारखी पारंपारिक पिके वाळूच्या जमिनीत घेतली जात होती, परंतु कमी उत्पादन आणि घटत्या नफ्यामुळे शेतकऱ्यांना या पिकांपासून नुकसान सहन करावे लागले. मग शेतकऱ्यांनी तज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि नवीन प्रयोगांशी समन्वय साधून वाळूच्या जमिनीत राजमाची लागवड सुरू केली. हा प्रयोग केवळ यशस्वी झाला नाही तर शेतकऱ्यांना खूप चांगला नफाही मिळाला.
राजमाच्या गुणवत्तेमुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारात मागणी वाढली आहे. याशिवाय, सरकारी शाळांमधील शालेय मुलांना राजमाची भाजी देखील दिली जात आहे. स्थानिक बाजारपेठेसोबतच ते राज्याबाहेरही पाठवले जात आहे. म्हणूनच व्यापारी चांगल्या किमतीत ते खरेदी करण्यासाठी गावोगावी पोहोचत आहेत. खुल्या बाजारात त्याची किंमत प्रति क्विंटल सुमारे 8500 ते 10000 रुपये आहे.
जीवघेण्या GBS मुळे पुण्यात 59 लोक रुग्णालयात तर 12 वेंटिलेटरवर
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना राजमा लागवडीसाठी प्रोत्साहित केले. त्यांनी माती परीक्षण, बियाणे वितरण आणि शेतीच्या आधुनिक पद्धतींचे प्रशिक्षण दिले. याचा परिणाम असा आहे की शेतकरी आधुनिक शेती करून राजमापासून चांगले उत्पन्न मिळवत आहेत.
पारंपारिक शेतीपेक्षा राजमा लागवडीतून जास्त नफा मिळतो हे पूर्णपणे खरे आहे. गेल्या वर्षी 2 एकर जमिनीत राजमाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुमारे 80 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला. वाळूच्या जमिनीत राजमाचे उत्पादन खूप चांगले येते. यामध्ये सिंचनाची गरजही कमी आहे. राजमा शेती शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरत आहे. सिंचनासाठी उच्च दर्जाचे बियाणे, सेंद्रिय खते आणि ठिबक सिंचन प्रणाली वापरताना दिसत आहेत. राजमाची लागवड यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रांचा अवलंब केल्यामुळे ते समृद्ध होऊ लागले आहेत.