Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला मंजुरी, कोणता लाभ होणार?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशाच्या कृषी आणि ऊर्जा क्षेत्राला चालना देणारे तीन महत्त्वाचे निर्णय मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांना मोठी भेट देत मोदी सरकारने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना मंजूर केली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 16, 2025 | 08:02 PM
केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला मंजुरी, कोणता लाभ होणार?

केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला मंजुरी, कोणता लाभ होणार?

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत देशाच्या कृषी आणि ऊर्जा क्षेत्राला चालना देणारे तीन महत्त्वाचे निर्णय मंजूर करण्यात आले. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना आणि कृषी जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाच्या योजनेला मान्यता देण्यात आली, तर दुसरीकडे अक्षय ऊर्जेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

BJP News : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकणार नाही, काय आहे नेमकं कारण?

मंत्रिमंडळाने २०२५-२६ पासून सहा वर्षांसाठी “प्रधानमंत्री धन-धन कृषी योजना” मंजूर केली आहे. या योजनेंतर्गत १०० कृषी जिल्हे विकसित करण्याचं उद्दीष्ट आहे. कृषी उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देणे, शाश्वत कृषी पर्यायांचा अवलंब करणे, पंचायत आणि ब्लॉक स्तरावर साठवण सुविधा वाढवणे, सिंचन व्यवस्था सुधारण्याचं काम या अंदर्गत होणार आहे.

योजना ११ मंत्रालयांच्या ३६ योजनांच्या समन्वयातून राबविण्यात येईल, ज्यामध्ये राज्य सरकारांच्या योजना आणि खासगी क्षेत्राच्या भागीदारीचाही समावेश असेल. कमी उत्पादकता, कमी पीक चक्र आणि कमी कर्ज वितरण अशा तीन प्रमुख निकषांवर आधारित १०० जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक राज्यातील किमान एक जिल्हा समाविष्ट केला जाईल.

मंत्रिमंडळाने एनटीपीसी लिमिटेडला अक्षय ऊर्जा क्षेत्रात विद्यमान मर्यादेपेक्षा २०,००० कोटी रुपयांपर्यंत अधिक गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. २०३२ पर्यंत ६० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता साध्य करता यावी यासाटी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एनजीईएल) आणि त्यांच्या उपकंपन्या आणि संयुक्त उपक्रमांद्वारे ही गुंतवणूक केली जाणार आहे.

ओडिशा विधानसभेबाहेर मोठा राडा; विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर लोक उतरले रस्त्यावर, पोलिसांनी तातडीने…

एनएलसीआयएलला ७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची विशेष सूट देण्यात आली आहे. या कंपनीची उपकंपनी एनएलसी इंडिया रिन्यूएबल्स लिमिटेडद्वारे (एनआयआरएल) अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणार आहे. यामुळे कंपनीला ऑपरेशनल आणि आर्थिक लवचिकता मिळणार आहे.

Web Title: Union government cabinet meeting approves pmddky ntpc nlcil investment latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 05:33 PM

Topics:  

  • Farmers
  • Modi government
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Modi Government: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून जीवनावश्यक वस्तू ३० जूनपर्यंत करमुक्त
1

Modi Government: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून जीवनावश्यक वस्तू ३० जूनपर्यंत करमुक्त

Maharashtra Unseasonal Rain: शेतकरी हवालदिल! अवकाळीमुळे ५५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान, ३० हजारांहून अधिक बाधित
2

Maharashtra Unseasonal Rain: शेतकरी हवालदिल! अवकाळीमुळे ५५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान, ३० हजारांहून अधिक बाधित

भोर तालुक्यात कुटुंबे उघड्यावर; गारपीठ अन् वादळी पावसामुळे शेतीसह घरांचे अतोनात नुकसान
3

भोर तालुक्यात कुटुंबे उघड्यावर; गारपीठ अन् वादळी पावसामुळे शेतीसह घरांचे अतोनात नुकसान

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा; मंत्री जयकुमार रावल
4

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा; मंत्री जयकुमार रावल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.