• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Bjp Leader Yogesh Tillekar Criticizes On Maha Vikas Aghadi Government Nrka

महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरमुळेच ओबीसी समाजाचे मोठे नुकसान : योगेश टिळेकर

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरमुळेच ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी गुरुवारी केली.

  • By Navarashtra News Network
Updated On: Aug 26, 2021 | 06:05 PM
महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरमुळेच ओबीसी समाजाचे मोठे नुकसान : योगेश टिळेकर
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू होण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या वॉर्ड रचनेचा आदेश दिल्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरमुळेच ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांनी गुरुवारी केली.

महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या आगामी काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकात ओबीसींना राजकीय आरक्षण मिळूच नये, असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असल्याचा संशय या सरकारच्या ढिलाईवरून येतो, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील अठरा महानगरपालिकांच्या प्रशासनाला निवडणुकीसाठी वॉर्ड रचनेचा मसुदा तयार करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर न्यायालयाच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारने तातडीने एंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे हे आरक्षण पुन्हा अंमलात आणणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात आघाडी सरकारने या विषयात चालढकल चालविली आहे तर दुसरीकडे ओबीसींचे आरक्षण पुन्हा लागू होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. परिणामी, ओबीसी समाज राजकीय आरक्षणपासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नुकसानीला पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे.

त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात आयोगामार्फत ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने संपूर्ण मदत केली तर राज्य मागासवर्ग आयोगामार्फत ही माहिती काही महिन्यात गोळा होऊ शकते आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा प्रस्थापित होऊ शकते. दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी आयोगाला मदत करत नाही. राज्य सरकारच्या बेफिकीरीमुळे न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले आणि आता त्यांच्याच ढिलाईमुळे ते पुन्हा मिळत नाही.

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने निकालात ओबीसींची जनगणना नव्हे तर सर्वेक्षणाच्या आधारे गोळा केलेला एंपिरिकल डेटा मागितला आहे. जनगणनेचे काम क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे. एंपिरिकल डेटा गोळा करणे हे कमी वेळाचे काम आहे. मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने लगेच काम सुरू केले असते तरी आतापर्यंत ते बरेचसे पूर्ण झाले असते. तरीही महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या जनगणनेवर अडून बसले आहे आणि विनाकारण हा प्रश्न गुंतागुंतीचा करत आहे. आता तर राज्य सरकारने या विषयात सर्वोच्च न्यायालयात याचिका करून आणखी गुंतागूंत करून ठेवली आहे.

Web Title: Bjp leader yogesh tillekar criticizes on maha vikas aghadi government nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2021 | 06:05 PM

Topics:  

  • Maha Vikas Aghadi Government

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bihar Election 2025: बिहारच्या राजकारणात नवीन पक्षांचा प्रवेश, ‘हे’ पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवणार, २०२० मध्ये किती उमेदवार होते?

Bihar Election 2025: बिहारच्या राजकारणात नवीन पक्षांचा प्रवेश, ‘हे’ पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवणार, २०२० मध्ये किती उमेदवार होते?

आशियाई आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीने भारताच्या नावावर केली चार पदके

आशियाई आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीने भारताच्या नावावर केली चार पदके

इमरान हाश्मीने सुरु केले ‘Awarapan 2’चे शूटिंग, निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी

इमरान हाश्मीने सुरु केले ‘Awarapan 2’चे शूटिंग, निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी

मधुमेह झाल्यानंतर केवळ 3–5 वर्षांत तरुणांमध्ये वाढतोय डायबीटिक रेटिनोपथीचा धोका, नेत्रतज्ज्ञांनी दिला धक्कादायक इशारा

मधुमेह झाल्यानंतर केवळ 3–5 वर्षांत तरुणांमध्ये वाढतोय डायबीटिक रेटिनोपथीचा धोका, नेत्रतज्ज्ञांनी दिला धक्कादायक इशारा

साडेतीन जागृत शक्तिपीठांच्या प्रचितींची आई तुळजाभवानी मालिकेत अनुभूती!

साडेतीन जागृत शक्तिपीठांच्या प्रचितींची आई तुळजाभवानी मालिकेत अनुभूती!

IND vs PAK Final Match : आशिया कपची ट्राॅफी भारताला नाही मिळाली तर मग कोणाला मिळणार? जाणून घ्या संपूर्ण नियम

IND vs PAK Final Match : आशिया कपची ट्राॅफी भारताला नाही मिळाली तर मग कोणाला मिळणार? जाणून घ्या संपूर्ण नियम

  IND vs PAK : तिलक वर्माने टी-२० मध्ये रचला इतिहास! भारतासाठी ‘हा’ भीम पराक्रम करून दिला  क्रिकेट विश्वाला धक्का..

  IND vs PAK : तिलक वर्माने टी-२० मध्ये रचला इतिहास! भारतासाठी ‘हा’ भीम पराक्रम करून दिला  क्रिकेट विश्वाला धक्का..

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.