• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Ojas Devtale And Aditi Swamy Led India To Five Medals At The Asiad In Hangzhou

पुरस्कार निमित्तमात्र!

आजच्या 'हायटेक स्पोर्ट्स ट्रेनिंग' युगामध्ये हे ऐकायलाच कसं तरी वाटतं. गुरुकुल पद्धत किंवा घरकुल पद्धत आहे तरी काय? प्रवीण सावंत म्हणत होते, ही गुरुकुल पद्धत प्राचिन काळापासूनच, पूर्वापार चालत असलेली पद्धत आहे. रामायण, महाभारतातदेखील युद्धकलेपासून अन्य कला शिकविण्यासाठी गुरूसोबत, घरापासून दूर गुरूकुलात राहण्याची पद्धत होती. तीच पद्धत दृष्टी आर्चरी अॅकॅडमी राबवते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 17, 2023 | 12:35 PM
पुरस्कार निमित्तमात्र!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशातील सर्वोत्तम व्यक्तींचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान होतो; तो एक आगळावेगळा सोहळा असतो. क्रीडाक्षेत्रातील सर्वोत्तम खेळाडू आणि प्रशिक्षकांचा देखील गौरव करण्याची आपल्या देशाची उज्ज्वल परंपरा आहे. द्रोणाचार्य, अर्जुन, खेल रत्न, मेजर ध्यानचंद पुरस्कारांनी जेव्हा मान्यवर खेळाडूंना गौरविले जाते, तो एक अविस्मरणीय क्षण असतो. त्या एका व्यक्तीच्या, खेळाडूच्या गौरवगाथेसाठी अनेकांनी प्रयत्न केलेले असतात. घरच्यांपासून प्रशिक्षक, फिझिओ, ट्रेनर, प्रशासकीय यंत्रणेतील माणसांचे हातभार त्या यशापाठी असतात. जेव्हा क्रिकेटपटू व्यतिरिक्त खेळाडूंचा गौरव अशा सर्वोत्तम क्रीडापुरस्कारांनी होतो; त्यावेळी अन्य खेळाडूंसाठीही आशेचा किरण दिसायला लागतो. आपल्या पाठीही देश, सरकार, खेळातील अधिकारी आणि घरचे उभे आहेत, हा विश्वास दृढ व्हायला लागतो.
हाच विश्वास अधिक घट्‌ट होतो जेव्हा, वॉर्डबॉय ते पोलिस कॉन्स्टेबल असा प्रवास करणारा प्रवीण सावंत, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मुलांना हुडकून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तिरंदाज घडवून आपले, स्वत:चे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करतो. ओजस देवतळे आणि अदिती स्वामी यांनी हॅंगशू येथील एशियाडमध्ये भारताला पाच पदके मिळवून दिली. त्यातील चार सुवर्णपदके होती. ओजसने वैयक्तिक, मिक्स टिम आणि पुरुषांच्या सांघिकमध्ये सुवर्णपदके पटकाविली. आदितीने महिलांच्या सांघिकचे सुवर्ण आणि वैयक्तिक प्रकारात कांस्य पदक पटकाविले. असे २०-२२ ओजस आणि आदिती सध्या दृष्टी आर्चरी अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. जेथे प्रवीण सावंत प्रशिक्षक आहेत. प्रवीण सावंत यांच्या ओजस आणि आदिती या दोन शिष्यांच्या नावाची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

हा प्रवीण सावंत मोठा हिकमती माणूस. बिजींग ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाजांचे झालेले पतन पाहून अस्वस्थ झाला. अवघा एकच भारतीय स्पर्धक तिरंदाजी स्पर्धेत उतरला होता. प्रवीण सावंत यांना आश्चर्य वाटले. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा भारत देशातून फक्त एकच स्पर्धक ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतो? हे शल्य त्यांच्या जिव्हारी लागले. तिरंदाजी होण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. मात्र घरच्या गरिबीमुळे त्याला हा महागडा खेळ काही खेळता येत नव्हता. वाईच्या एका हॉस्पिटलमध्ये त्याने वॉर्डबॉयची नोकरी पत्करली. पगार महिना १५०० रुपये फक्त. वॉर्डबॉयचे कामही सोपे नव्हते. १२ तासाची नाईट शिफ्ट करून, प्रवीण ४५ किलोमीटर्स दूरवर असलेल्या साताऱ्याच्या एका आर्चरी अॅकॅडमीमध्ये बसने दररोज जायचा. बांबूपासून बनविलेल्या धनुष्याने सराव करायचा. झोपेची पुरती वाट लागलेली होती.

दरम्यान भारतात तिरंदाजीला चांगले दिवस यायला लागले होते. २०११ साली प्रवीणला पोलिसात नोकरी लागली. तेथेही प्रवीणचे दिवसा तिरंदाजी प्रशिक्षण आणि रात्री सातारा पोलीस हेडक्वार्ट्समध्ये गार्डची नोकरी. प्रवीणने पगाराच्या पैशातून सेकंडहॅन्ड धनुष्य घेतले. स्वत: शिकता शिकता तो इतरांनाही मार्गदर्शन करायला लागला. त्याच भूमिकेतून तो कधी प्रशिक्षक बनला ते त्यालाही कळले नाही. २०१७ साली प्रवीणने दृष्टी आर्चरी अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षक म्हणून नोकरी पत्करली.

तो क्षण भारतीय किंवा महाराष्ट्राच्या तिरंदाजीला कलाटणी देणारा ठरला. कारण दृष्टी आर्चरी अॅकॅडमीची तिरंदाजी शिकविण्याची पद्धत आगळी वेगळी, अगदी जगावेगळी होती. गुरुकुल किंवा घरकुल पद्धतीने ही अॅकॅडमी काम करते.
आजच्या ‘हायटेक स्पोर्ट्स ट्रेनिंग’ युगामध्ये हे ऐकायलाच कसं तरी वाटतं. गुरुकुल पद्धत किंवा घरकुल पद्धत आहे तरी काय? प्रवीण सावंत म्हणत होते, ही गुरुकुल पद्धत प्राचिन काळापासूनच, पूर्वापार चालत असलेली पद्धत आहे. रामायण, महाभारतातदेखील युद्धकलेपासून अन्य कला शिकविण्यासाठी गुरूसोबत, घरापासून दूर गुरूकुलात राहण्याची पद्धत होती. तीच पद्धत दृष्टी आर्चरी अॅकॅडमी राबवते.

खरं तर तिरंदाजी हा प्रकारच मूळात प्राचिन काळात अधिक प्रचलित आणि वापरात असलेला प्रकार. युद्धांमध्ये धनुर्धारी योद्ध्याची पतच मोठी असायची. आम्ही काही वेगळे करीत नाही; आपली प्राचिन कला, निसर्गाच्या सान्निध्यात घरापासून अंतर ठेवून शिकतो एवढेच.
प्रवीण सावंत म्हणत होते, मैदान हेच या मुलांचे घर आहे. त्यांच्याकडे मोबाईलदेखील दिला जात नाही. चार भिंतींच्या आत शिकण्याची तिरंदाजी ही कला किंवा खेळ नाही. आम्ही प्रशिक्षकदेखील त्यांच्यासोबत रहातो. त्यांच्यासोबतच जेवतो. खुल्या वातावरणात, तणावरहीत अशी प्रशिक्षण पद्धती आहे. आम्ही मुलांना फार काही आधुनिक देऊ शकत नाही. मात्र त्यांच्यात जिंकण्याची प्रचंड जिद्द निर्माण करू शकतो. प्रत्येकाला भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहण्याचे सुचवू शकतो. कधी कधी मध्यरात्री किंवा पहाटेच मुलांना उठवितो आणि बाहेर आकाशाखाली आणतो. त्यांना खुल्या डोळ्यांनी भारतासाठी स्वप्न पाहण्यास सांगतो.

सुखसोयींशिवाय जर तुम्ही स्वप्न सत्यात उतरविण्याची जिद्द बाळगली तरच यशस्वी होऊ शकता. अर्जुनाप्रमाणे एकच लक्ष्य नजरेसमोर असले पाहिजे. बाकी साऱ्या गोष्टी गौण असतात. वेळेप्रसंगी आमचे तिरंदाज आणि आम्ही प्रशिक्षक बकऱ्यांच्या खुराड्यामध्येही राहिलो आहोत. सांगण्याचा हेतू हा की लक्ष्य फक्त भारतासाठी पदके आणण्याचे असताना दररोजचे राहणीमान, फारसे निर्णायक ठरत नाही. धनुष्य-बाण आणि समोर १० पैकी १० गुण मिळविण्याचे एकच लक्ष्य असते. अन्य लोभ, प्रलोभने, अमिषे यांपासून चार हात लांब राहीलो तर लक्ष्याच्या जवळ जाणे सोपे असते. ही आमची गुरुकूल पद्धत.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, मौलाना अब्दुल आझाद ट्रॉफी, ध्यानचंद पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आदींसाठी शिफारस करण्यात आलेल्या भारताच्या अनेक दर्जेदार खेळाडूंचे गुरू जवळपास असेच आहेत. काही गुरुंनी प्रशिक्षण पद्धतीला आधुनिक यंत्रणेची जोड दिली आहे. काहींनी आधुनिक क्रीडा साहित्याची तर काहींनी अधिकाधिक स्पर्धांमधील सहभागाची. मात्र कुणापुढेही हात न पसरता स्वत:चे भारतासाठी पदके मिळविण्याचे स्वप्न जगणारा प्रवीण सावंत यांच्यासारखा प्रशिक्षक आगळावेगळाच. तिरंदाजी हा आदिवासी भागातला, आदिवासींच्या रोमारोमात भिनलेला खेळ आहे. त्या खेळाची जोपासना देखील तशाच मोकळ्या वातावरणातच व्हायला हवी. आज देशात चार भिंतीतही तिरंदाजी प्रशिक्षण दिले जाते. मात्र जंगलात, डोंगरदऱ्यात आणि खुल्या आकाशाखाली या खेळाचे प्रशिक्षण दिले तर काय होऊ शकते ही एक नवी ‘दृष्टी’ प्रवीण सावंत यांच्या आर्चरी अॅकॅडमीने आपल्याला दिली आहे.

– विनायक दळवी

Web Title: Ojas devtale and aditi swamy led india to five medals at the asiad in hangzhou

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2023 | 12:35 PM

Topics:  

  • Major Dhyan Chand Khel Ratna Award

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शंकराचा ‘हा’ अवतार महाभारतात होता योद्धा! वडिलांच्या नावानेच थरथरत होते संपूर्ण सैन्य

शंकराचा ‘हा’ अवतार महाभारतात होता योद्धा! वडिलांच्या नावानेच थरथरत होते संपूर्ण सैन्य

Oct 19, 2025 | 08:38 PM
Oben Electric ची ‘ही’ बाईक आता Flipkart वरून बुक करता येणार!

Oben Electric ची ‘ही’ बाईक आता Flipkart वरून बुक करता येणार!

Oct 19, 2025 | 08:31 PM
युद्धविराम की राजकीय खेळी? हमासची युद्धबंदीच्या उल्लंघनाच्या आरोपांवर प्रतिक्रिया ; मोठा कट रचला जात असल्याचा दावा

युद्धविराम की राजकीय खेळी? हमासची युद्धबंदीच्या उल्लंघनाच्या आरोपांवर प्रतिक्रिया ; मोठा कट रचला जात असल्याचा दावा

Oct 19, 2025 | 08:25 PM
नसांमध्ये अडकलेला सर्व कचरा 100% पडेल बाहेर, आहारतज्ज्ञांनी सांगितला सफरचंद-लिंबाचा खात्रीशीर उपाय; लगेच दिसून येईल फरक

नसांमध्ये अडकलेला सर्व कचरा 100% पडेल बाहेर, आहारतज्ज्ञांनी सांगितला सफरचंद-लिंबाचा खात्रीशीर उपाय; लगेच दिसून येईल फरक

Oct 19, 2025 | 08:15 PM
‘या’ देवांचे वास्तव्य आजही आहे पृथ्वीतलावर! कुणाला मिळाला वरदान तर कुणाला श्राप… पण आजही आहेत चिरंजीव

‘या’ देवांचे वास्तव्य आजही आहे पृथ्वीतलावर! कुणाला मिळाला वरदान तर कुणाला श्राप… पण आजही आहेत चिरंजीव

Oct 19, 2025 | 08:14 PM
Special Trains 2025: दिवाळी आणि छट पूजेसाठी रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! ‘या’ मार्गांवर धावणार १,७०२ विशेष ट्रेन्स

Special Trains 2025: दिवाळी आणि छट पूजेसाठी रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! ‘या’ मार्गांवर धावणार १,७०२ विशेष ट्रेन्स

Oct 19, 2025 | 08:12 PM
Diwali 2025: दिवाळीच्या मुहूर्तावर Vi घेऊन आलाय एक धमाकेदार प्लॅन, 300GB हाय-स्पीड डेटासह मिळणार Disney+ Hotstar चे सबस्क्रीप्शन

Diwali 2025: दिवाळीच्या मुहूर्तावर Vi घेऊन आलाय एक धमाकेदार प्लॅन, 300GB हाय-स्पीड डेटासह मिळणार Disney+ Hotstar चे सबस्क्रीप्शन

Oct 19, 2025 | 07:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Oct 19, 2025 | 07:17 PM
Raju Shetti HND Hostel : मोहोळांचा हात नसेल तर त्यांनी पुढाकार घेवून व्यवहार रद्द करा

Raju Shetti HND Hostel : मोहोळांचा हात नसेल तर त्यांनी पुढाकार घेवून व्यवहार रद्द करा

Oct 19, 2025 | 05:58 PM
Asaduddin Owaisi : एमआयएमचा स्वबळाचा नारा, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी

Asaduddin Owaisi : एमआयएमचा स्वबळाचा नारा, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी

Oct 19, 2025 | 04:45 PM
Sambhajinagar : रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्याला केंद्राचा हिरवा कंदील

Sambhajinagar : रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्याला केंद्राचा हिरवा कंदील

Oct 19, 2025 | 04:33 PM
Sanjay Bansode : आमदार संजय बनसोडे यांनी घेतला मदतीसाठी पुढाकार घेतला

Sanjay Bansode : आमदार संजय बनसोडे यांनी घेतला मदतीसाठी पुढाकार घेतला

Oct 19, 2025 | 04:15 PM
Shivajirao Kardile : आम्ही कधीही साहेबांना विसरू शकत नाही, कर्डिलेंच्या आठवणीने दाटला कंठ

Shivajirao Kardile : आम्ही कधीही साहेबांना विसरू शकत नाही, कर्डिलेंच्या आठवणीने दाटला कंठ

Oct 19, 2025 | 04:10 PM
Ratnagiri : रत्नागिरीच्या रस्त्यांवरून शिवसेना ठाकरे गटाची सामंतांवर टीका

Ratnagiri : रत्नागिरीच्या रस्त्यांवरून शिवसेना ठाकरे गटाची सामंतांवर टीका

Oct 19, 2025 | 01:49 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.