१. दादरमधील कबुतरखाना बंदच राहणार – मुंबई हायकोर्ट
२. कोर्टाच्या निर्णयाला जैन समाजाचा विरोध
३. सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार
मुंबई/kabutarkhana: मुंबईमधील दादर परिसरात असणारा कबुतरखाना सध्या वादाचा विषय बनला आहे. महापालिकेने हा कबुतरखाना बंद केला होता. त्यानंतर जैन समाजाने या ठिकाणी मोठे आंदोलन केले. त्या ठिकाणी बांधण्यात आलेली ताडपत्री काढून टाकण्यात आली. दरम्यान हे प्रकरण हायकोर्टात पोहोचले. हायकोर्टाने कबुतरांना अन्न, पाणी घालण्यास बंदी कायम ठेवली. मग कबुतरखान्यावरील बंदी उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने देखील कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे.
सुप्रीम कोर्टाने कबुतरखान्यासदर्भात हायकोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. हायकोर्टाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे कबुतरखान्यावरील बंदी अशीच कायम राहणार आहे. मात्र या विषयवार जैन समाज आक्रमक झाला आहे. जैन समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. कबुतरखाना बंद करायला जैन समाजाचा विरोध आहे.
मुंबई हायकोर्टाने दादर येथील कबुतर खाना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाला जैन समाजाचा विरोध आहे. या विरोधात जैन समाजाने उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता कबुतरखाना बंदच राहणार आहे.
मोठी बातमी! नागरिकांचं आरोग्य महत्वाचं; हायकोर्टाकडून कबुतरांना अन्न, पाणी देण्यास बंदी कायम
कबुतरे वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण निर्णय
कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, कबूतरखान्याबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत आपल्या संवेदनशील मनाची पुन्हा एकदा ओळख देत कबुतरांचे प्राण वाचवून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कबुतरखान्याच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
हायकोर्टात काय घडले?
गेल्या काही दिवसांपासून दादरमधील कबुतरखाना हा अत्यंत चर्चेचा विषय ठरला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कबुतरखान्यावर ताडपत्री घालून तो बंद केला होता. मात्र या निर्णयानंतर जैन समाज आक्रमक झाल्याचेआपल्याला पहायला मिळाले. त्यानंतर या प्रकरणात मुंबई हायकोर्टात दाद मागण्यात आली होती. त्यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत हायकोर्टाने कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे.