
जोडीदाराच्या आयुष्यात पहिलं स्थान हवंय? मग नात्यात करू नका 'या' 3 चुका
Mental Health Tip : धावपळीच्या आयुष्यात शांतता हवीय? मग ‘हा’ मंत्र वापरुन पहा, मानसिक शांतता मिळेल
जोडीदाराला पर्सनल स्पेस न देणे
पहिली मोठी चूक म्हणजे जोडीदाराला स्वतःची पर्सनल स्पेस न देणे नात्याच्या सुरुवातीला चोवीस तास एकत्र राहणे, सतत मेसेज किंवा कॉल करणे खूप छान वाटते. पण काळानुसार प्रत्येकाला स्वतःचे आयुष्य, मित्रमैत्रिणी, छंद आणि थोडा एकांत हवा असतो. जर तुम्ही पार्टनरवर सतत पाळत ठेवली, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना त्यांच्या मित्रांना भेटण्यापासून रोखलं तर त्यांना या नात्यात गुदमरल्यासारखं वाटू लागेल. जेव्हा तुम्ही त्यांना हवी ती स्पेस देता, तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर वाढतो.
सतत तक्रारींचा पाढा वाचणे
दुसरी चूक म्हणजे सतत तक्रारींचा पाढा वाचणे आणि नकारात्मक बोलणे. जेव्हा जेव्हा तुम्ही दोघे भेटता किंवा फोनवर बोलता, तेव्हा जर तुम्ही फक्त ऑफिसचा ताण, इतरांबद्दलच्या तक्रारी किंवा ‘तू माझ्यासाठी काय केलंस?’ असा टोमणा मारत राहिलात तर जोडीदार हळूहळू तुमच्याशी बोलणं टाळू लागेल. कोणत्याही व्यक्तीला अशा पार्टनरसोबत वेळ घालवायला आवडतो जो आनंदी, सकारात्मक आणि उत्साही असतो. सततच्या कटकटीमुळे तुमच्यासोबत घालवलेला वेळ त्यांना मानसिक थकवा देणारा वाटू शकतो.
मुंबईहून करा या 5 भन्नाट रोड ट्रिप्स; पावसाळ्यातील प्रवास आयुष्यभर लक्षात राहील
स्वतःचे अस्तित्व पूर्णपणे विसरून जाणे
तिसरी आणि सर्वात घातक चूक म्हणजे स्वतःचे अस्तित्व पूर्णपणे विसरून जाणे. अनेकदा जोडीदाराला खुश करण्याच्या नादात लोक स्वतःचे छंद, स्वतःचे मित्र आणि स्वतःची करिअरची स्वप्नं बाजूला ठेवतात आणि संपूर्ण आयुष्य फक्त पार्टनरभोवतीच केंद्रित करतात. पण लक्षात ठेवा जो माणूस स्वतःचा आदर करत नाही त्याला दुसऱ्यांकडूनही आदर मिळत नाही. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी पार्टनरवर विसंबून राहिलात तर नात्यातला थरार संपून जातो आणि तुम्ही त्यांना टेकन फॉर ग्रांटेड वाटू लागता. त्याऐवजी स्वतःला ग्रूम करा, तुमच्या आवडीनिवडी जपा आणि स्वावलंबी बना.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)