(फोटो सौजन्य: Pinterest)
Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय
1. माळशेज घाट
मुंबईपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर असलेला माळशेज घाट पावसाळ्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. हिरव्यागार दऱ्या, धबधबे, धुक्याने झाकलेले डोंगर आणि थंडगार वातावरण यामुळे पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात. कुटुंब आणि मित्रांसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण आदर्श मानले जाते.
2. अँबी व्हॅली
मुंबईपासून जवळपास 120 ते 130 किलोमीटर अंतरावर असलेली अँबी व्हॅली लक्झरी आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. येथे विविध साहसी उपक्रम आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. पावसाळ्यात या ठिकाणी जाणारा वळणावळणाचा रस्ता आणि सभोवतालचे निसर्गसौंदर्य प्रवास अधिक खास बनवते.
3. नाशिक
नाशिक हे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. मुंबईहून नाशिकला पोहोचण्यासाठी साधारण तीन तास लागतात. पावसाळ्यात या मार्गावरील हिरवाई, डोंगररांगा आणि शांत वातावरण प्रवाशांना आकर्षित करते. वाटेत अनेक प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळे पाहण्याची संधीही मिळते.
4. अलीबाग
मुंबईपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेले अलीबाग हे समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. स्वच्छ किनारे, फेरी राईड्स आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आवडते ठरते. विशेषतः जोडप्यांसाठी ही रोड ट्रिप संस्मरणीय अनुभव देणारी ठरू शकते.
राम मंदिर आणि काशी विश्वनाथांचे दर्शन करायचंय? IRCTC देत आहे 9 दिवसांत 8 धार्मिक स्थळ फिरण्याची संधी
5. पालघर
शहराच्या गजबजाटापासून दूर शांतता अनुभवायची असेल तर पालघर हा उत्तम पर्याय आहे. मुंबईहून येथे पोहोचण्यासाठी साधारण तीन ते चार तास लागतात. सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गरम्य परिसर यामुळे पालघरची सफर अविस्मरणीय ठरते. पावसाळ्यात येथील निसर्ग अधिक खुलून दिसतो.






