
भारतातील 70% महिला शांतपणे सहन करतात या समस्या... डॉक्टरांकडून जाणून घ्या कधी सावधान होण्याची गरज आहे?
अनेकदा माैनाचे कारण संकोच असते. मासिक पाळी किंवा योनिच्या आरोग्याबद्दल खुलून बोलले जात नाही आणि याविषयी चर्चा करणं लज्जास्पद मानलं जातं. काही महिलांनी वाटते की फार गंभीर स्थिती किंवा आजार नाही. बहुतेकदा असेच घडते. लहान शहरे आणि ग्रामीण भागात स्त्रीरोग तज्ञांची उपलब्धता मर्यादित असते, तर शहरांमध्ये व्यस्त जीवन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि यामुळेच त्यांचे आरोग्य आणखी धोक्यात येत असते.
तज्ञ काय म्हणतात?
स्त्रीरोगतज्ज्ञ यावर सांगतात की, महिलांच्या शरीरात अनेक बदल घडून येत असतात. असा अंदाज लावला जात आहे की, भारतात तब्बल ७० टक्क्यांहून अधिक महिलांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी स्त्रीरोगविषयक समस्या जाणवू लागतात मात्र जागरुकता नसल्याने किंवा वेळेवर तपासणी न केल्याने अनेक प्रकरणांमध्ये महिलांच्या समस्येचे निदान केले जात नाही. डाॅक्टरांच्या मते, महिलांनी आपल्या मासिक पाळीकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मासिक पाळीचा त्रास सहन करण्यायोग्य असेल तर ते सामान्य आहे पण जर हा त्रास वाढत असेल, तुमच्या शरीरातून प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल दर तासाला तुम्हाला पॅड बदलण्याची वेळ पडत असेल तर, सात दिवसांहून अधिक काळ शरीरातून रक्तस्त्राव होत असेल तर वेळीच रुग्णालय गाठून यावर डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या. चांगली स्वच्छता पाळा, परंतु यासाठी रासायनिक उत्पादनांचा वापर करणे टाळा कारण वजाईनामध्ये स्वतःच स्वतःला स्वच्छ ठेवण्याची ताकद असते.
जीवनशैलीकडे लक्ष देणे महत्त्वाचे
आपल्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. शरीरातील पोषण आणि वजन हे हार्मोनल संतुलनाशी देखील जोडलेले असते. आहारात लोह, प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्वांचा समावेश असणे गरजेचे आहे. वजन गरजेपेक्षा जास्त किंवा कमी असल्यास PCOS आणि वंध्यत्व सारख्या समस्यांचा धोका वाढत असतो. नियमित पुरेशी झोप आणि व्यायम हार्मोन्स संतुलिक करण्यास आपली मदत करतात. शारीरिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या महिलांनी त्यांच्या डॉक्टरांनी शिफारस केल्यानुसार नियमित गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी आणि HPV लसीकरणाचा विचार करावा. याचबरोबर मानसिक आरोग्याचीही तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे. सततचा ताणतवाण, झोपेचा अभाव आणि चिंता मासिक पाळीवर थेट परिणाम करते. यामुळे महिलांनी आपल्या जीवनशैलीकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे ज्यामुळे कोणती आरोग्य समस्या जाणवल्यास तिला ती टाळण्यास किंवा आजारांपासून दूर राहण्यास मदत होईल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.