Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात Vitamin B12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 27, 2025 | 08:46 AM
शरीरात Vitamin B12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

शरीरात Vitamin B12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

शरीर कायमच निरोगी राहण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव सक्रिय असणे अतिशय महत्वाचे आहे. पण शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरते. शरीराला विटामिन बी १२ ची खूप जास्त आवश्यकता असते. विटामिन बी १२ शरीरातील लाल रक्त पेशी वाढवते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. पण धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, अपुरी झोप आणि तिखट तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम दिसून येतात. त्यामुळे कायमच शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात.(फोटो सौजन्य – istock)

दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास किडनी सडून होईल मुतखडा, चुकूनही करू नका नियमित सेवन

विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर शारीरिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. थकवा, अशक्तपणा येणे, भूक कमी होणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचा करावेत. विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर मानसिक आजार, पचनक्रिया वारंवार बिघडणे, शारीरिक समस्या उद्भवू लागतात. आज आम्ही तुम्हाला विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? विटामिन बी १२ वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे:

गॅस आणि अपचन:

विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे वारंवार बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि पचनाच्या इतरही समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यासोबत घरगुती उपाय करणे सुद्धा आवश्यक आहे. आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्या आतड्यांमधील हालचाल सुलभ राहील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. याशिवाय खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतील.

भूक मंदावणे:

बऱ्याचदा कितीही आवडीचा पदार्थ बनवल्यानंतर तो खाण्याची जास्त इच्छा होत नाही. विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर शरीराची भूक पूर्णपणे मंदावते. कोणतेही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. शरीराला आहारातून योग्य पोषण मिळत नाही. तसेच विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे पायांमध्ये जळजळ, वेदना, सूज इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.

मळमळ:

विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे पोटात जडपणा वाढू लागतो. याशिवाय उलट्या, मळमळ, वारंवार होणारी ऍसिडिटी इत्यादी लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.

CML उपचारांच्या उद्दिष्टांमध्ये बदल, क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमियाचे पालटले स्वरूप; कसे जाणून घ्या

विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन:

विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आहारात दूध, पनीर,दही इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे विटामिन बी १२ ची कमतरता भरून निघण्यास मदत होते. याशिवाय आंबट फळांचे सेवन केल्यासमुळे शरीराला विटामिन सी मिळते. सफरचंद, संत्री, केळी, किवी, पालेभाज्या, पालक पनीर इत्यादी पदार्थांचे नियमित सेवन करावे.

FAQs (संबंधित प्रश्न)

विटामिन बी१२ म्हणजे काय?

विटामिन बी१२ हे शरीरातील प्रत्येक पेशीसाठी आवश्यक आहे आणि ते मज्जासंस्था आणि लाल रक्तपेशींच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

विटामिन बी१२ ची कमतरता का होते?

आहारात या जीवनसत्त्वाचा समावेश नसणे, विशेषतः शाकाहारी आहारात, हे एक प्रमुख कारण आहे.शरीरामध्ये विटामिन शोषून घेण्याची क्षमता कमी असल्यास देखील कमतरता येऊ शकते.

विटामिन बी१२ च्या कमतरतेची लक्षणे काय आहेत?

अशक्तपणा किंवा खूप थकल्यासारखे वाटणे, मळमळ, उलट्या किंवा अतिसार होणे, भूक न लागणे, न्यूरोलॉजिकल लक्षणे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: After the deficiency of vitamin b12 in the body these serious health symptoms appear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • important vitamins
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक
1

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक

घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी धूप अगरबत्ती लावताय! अगरबत्तीमुळे उद्भवू शकतो कॅन्सरसारख्या ‘या’ गंभीर आजारांचा धोका
2

घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी धूप अगरबत्ती लावताय! अगरबत्तीमुळे उद्भवू शकतो कॅन्सरसारख्या ‘या’ गंभीर आजारांचा धोका

वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते
3

वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते

तुम्हाला सुद्धा कच्चा तांदूळ खाण्याची सवय आहे का? मग शरीरावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम, आतड्यांचे होईल नुकसान
4

तुम्हाला सुद्धा कच्चा तांदूळ खाण्याची सवय आहे का? मग शरीरावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम, आतड्यांचे होईल नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.