कंबर दुखीपासून आराम मिळवण्यासाठी अळीव खावेत
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या दिवसांमध्ये सर्दी, खोकल्यासह इतरही समस्या उद्भवतात. त्यामुळे पौष्टिक आहार घेऊन आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. थंडीच्या दिवसांमध्ये सतत कंबर दुखणे. हात पाय दुखणे, पाठ दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. कोणत्याही जागेवर जास्त वेळ बसून राहिल्यानंतर वर उठताना मोठ्या प्रमाणावर वेदना होतात. कंबर दुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर अनेक लोक मेडिकल मध्ये उपलब्ध असलेल्या गोळ्यांचे सेवन करतात. मात्र या गोळ्यांचे सतत सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कंबर दुखीपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थाचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
औषधी गुणधर्म असलेले अळीव आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. अळीवमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिनं, फायबर, आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. लाल रंगाच्या नाजूक साजूक बिया आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये नियमित या बियांचे सेवन करावे. बाजारात अळीव सहज उपलब्ध होतात. थंडीच्या दिवसांमध्ये अळीव खाल्यामुळे शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी अळीव बियांचे नियमित सेवांह केल्यास कंबर दुखीच्या वेदनांपासून कायमचा आराम मिळेल.
अळीव पासून खीर बनवली जाते. शिवाय लाडू किंवा मुखवास बनवताना अळीव बियांचा वापर केला जातो. रिकाम्या पोटी अळीव बियांचे सेवन केल्यास सकारात्मक परिणाम दिसून येईल. तसेच तुम्ही या बिया तूप आणि दुधात मिक्स करून खाऊ शकता. यामुळे शरीराला पोषण मिळेल. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अळीव, हळद आणि दूध एकत्र मिक्स करून खाल्यास शरीराला ऊर्जा मिळेल. तसेच थंडीमुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होईल.
हाडांमधील ताकद आणि उर्जा टिकवून ठेवण्यासाठी नियमित अळीव बियांचे सेवन करावे. या बिया हाडांचे आरोग्य मजबूत करण्यास मदत करतात. अळीव बियांमध्ये असलेले गुणधर्म सांधेदुखी आणि कंबर दुखीपासून वेदनांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. अळीव बियांचे सेवन केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते. त्यामुळे रोजच्या रोज पाण्यासोबत किंवा दुधासोबत अळीव बियांचे सेवन करावे. यामुळे कंबर दुखीचा त्रास कमी होईल.
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
अळीव बियांचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जातात, ज्यामुळे पचनाची समस्या उद्भवत नाही. त्यामुळे नियमित अळीव बियांचे सेवन करावे. अळीव बियांचे नियमित सेवन केल्यामुळे कंबर दुखीचा त्रासासोबतच पचनक्रिया सुधारते आणि शरीर मजबूत होते.