
पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील हे रोड ट्रिप रूट्स जिंकतील तुमचं मन
Monsoon Travel : पावसाळ्यात फॅमिली ट्रिप प्लॅन करताय? या ठिकाणांना चुकूनही भेट देऊ नका
लोणावळा ते पुणे एक्सप्रेसवे
पावसाळ्यात महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय रोड ट्रिप मागपैिकी हा एक आहे. दोन्ही बाजूंना हिरव्यागार टेकड्या, मध्येच दिसणारे धबधबे आणि धुक्याची चादर यामुळे हा प्रवास अविस्मरणीय ठरतो. विशेषतः लोनावळा परिसरात पावसाळ्यातील निसर्ग मन मोहून टाकतो.
ताम्हिणी घाट
पुणे आणि कोकणला जोडणारा ताम्हिणी घाट पावसाळ्यात जिवंत होतो. घाटातील असंख्य धबधबे, ढगांमध्ये हरवलेले रस्ते आणि निसर्गाचा सुंदर आविष्कार यामुळे हा मार्ग रोड ट्रिप प्रेमींसाठी स्वर्गच मानला जातो.
कसारा घाट ते इगतपुरी
मुंबई आणि नाशिकदरम्यानचा हा घाट पावसाळ्यात वेगळ्याच रूपात दिसतो. डोंगरांवरून कोसळणारे धबधबे, रेल्वे मार्गाचे सुंदर दृश्य आणि धुक्यात हरवलेली शिखरे पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करतात.
महाबळेश्वर ते प्रतापगड
वळणावळणाचे रस्ते, घनदाट जंगल आणि पावसाने नटलेला सह्याद्री अनुभवायचा असेल तर हा मार्ग उत्तम पर्याय आहे. या प्रवासात अनेक ठिकाणी थांबून निसर्गाचा आनंद घेता येतो.
आंबोली घाट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाट हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पावसाळी मागपैिकी एक मानला जातो. मुसळधार पाऊस, दाट धुके आणि उंचावरून कोसळणारे धबधबे या व ठिकाणाला वेगळीच ओळख देतात.
वरंधा घाट
पुण्याजवळील वरंधा घाट हा पावसाळ्यातील लपलेला खजिना आहे. खोल दऱ्या, हिरवीगार पर्वतरांग आणि शांत वातावरण यामुळे हा मार्ग विशेष आकर्षण ठरतो.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)