
मधुमेहामुळे डोळ्यांची नजर कायमची जाऊ शकते का? वाढलेला चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी 'हे' उपाय नक्की करा
मधुमेह झाल्यानंतर डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते का?
डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी उपाय?
मधुमेहामुळे डोळ्यांची नजर कायमची जाऊ शकते का?
जगभरात मधुमेह, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक आणि इतर गंभीर आजाराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह हा आजार कधीच बरा होत नाही. आजाराचे निदान झाल्यानंतर संपूर्ण आयुष्यभर गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. रक्तात साखर वाढल्यानंतर संपूर्ण शरीरात त्याची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अंगाला खाज येणे, सतत तहान लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. पण वेळीच मधुमेहाचे निदान न झाल्यास त्याचे परिणाम डोळ्यांवर सुद्धा दिसू लागतात. यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. रक्तात साखरेचे प्रमाण खूप जास्त झाल्यामुळे डोळ्यांच्या पडद्यावरील रक्तवाहिन्या कमकुवत आणि डोळ्यांची दृष्टी धूसर होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
रक्तात वाढलेली साखर संपूर्ण शरीर आतून पोखरून काढते. त्यामुळे कोणतेही लक्षणे दिसू लागल्यानंतर तातडीने उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा डोळ्यांसह इतर अवयवांनासुद्धा हानी पोहचू शकते. याशिवाय मोतीबिंदू आणि काचबिंदूचा धोका वाढतो. डोळ्यांच्या नसा आतून कमकुवत झाल्यामुळे दृष्टी कमी होते आणि डोळ्यांना हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळे दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर केवळ नंबर न तपासता मधुमेहाची चाचणी करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने लक्षणे वाढतात आणि शरीराला हानी पोहचते. प्रमाणापेक्षा जास्त साखर वाढल्यामुळे डोळ्यांच्या रक्तवाहिन्या फुटतात आणि त्यातून द्रव गळू लागतो. यामुळे डोळ्यांची दृष्टी कायमची जाऊ शकते. तसेच काहीवेळा डोळ्याच्या भिंगाचा आकार तात्पुरता बदलून जातो. डोळ्यांमधील पाण्याचा दाब वाढल्यामुळे मुख्य नसांवर ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे दुर्लक्ष न करता वेळीच मधुमेह चाचणी करणे आवश्यक आहे.
Colon Cancer: आतड्यांच्या कॅन्सरचा धोका कमी करायचा आहे? रोज खा ‘हे’ सुपरफूड्स
मधुमेहासारख्या अतिशय सामान्य पण गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे फार आवश्यक आहे. याशिवाय घरगुती उपाय केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. दिवसभरात ३० मिनिट चालणे फार आवश्यक आहे. यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. तसेच पांढरा भात, साखर, मैदा इत्यादी पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. प्रत्येक ३ महिन्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने HbA1c चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच वाढत्या मधुमेहामुळे डोळ्यांची कमकुवत झालेली दृष्टी सुधारण्यासाठी गाजर, रताळे आणि पपई इत्यादी बीटा-कॅरोटीन असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
Ans: मधुमेहामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ वाढले राहिल्यास डोळ्यांच्या पडद्यावर (रेटिना) परिणाम होऊ शकतो. योग्य वेळी उपचार न केल्यास दृष्टी कमी होण्याचा धोका वाढू शकतो.
Ans: चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी कोणताही घरगुती उपाय हमखास सिद्ध झालेला नाही. मात्र डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य आहार, नियमित तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.
Ans: हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा आहारात समावेश करणे, स्क्रीन टाइम नियंत्रित ठेवणे, पुरेशी झोप घेणे आणि नियमित नेत्र तपासणी करणे फायदेशीर ठरते.