
आता पर्यटनासाठी करा गावाची सफर! शिवरायांपासून ज्ञानोबापर्यंत या गावात आहे अनेक ऐतिहासिक गोष्टींचा साठा...
Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट
चऱ्होळी बुद्रुक गाव
पुण्याजवळील इंद्रायणी नदीकाठी वसलेले आणि आळंदीपासून अगदी ४-५ किलोमीटर लांब असलेले हे गाव बरेच जुने आहे. माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पेशव्यांच्या काळापर्यंत ऐतिहासिकदृष्ट्या याची महती फार प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला प्राचीन शस्त्रे. इतिहासकालीन वस्तू आणि प्रचीन मंदिर पाहता येतील. छत्रपतींच्या स्वराज्याशी जोडलेले तापकिर पाटील घराणं इथे फार लोकप्रिय आहे. आजही त्यांचे वंशज इथे राहत असल्याची माहिती आहे. हे गाव प्रामुख्याने शेती आणि दुग्ध व्यवसायासाठी ओळखले जाते. चऱ्होळी गावाची खासियत म्हणजे इथे जाताच जुन्या इतिहासाची झलक अनुभवता येते. गावात जुने वाडे आणि इतिहासकालीन अनेक वस्तूंचा संग्रह आहे ज्याला पाहण्याचं साैभाग्या या गावात गेल्यानंतर मिळतं. तुम्ही इथे वाघेश्वर मंदिर, खुरेश्वर महादेव मंदिर आणि काळभैरव या प्राचीन मंदिरांना भेट देऊ शकता.
कसे जायचे?
रेल्वे मार्ग- मुंबईहून पुण्याला जाणारी एक्सप्रेस पकडा. रेल्वे स्टेशनवर उतरा, पुणे स्टेशनला न जाता, पिंपरी स्टेशनवरून चऱ्होलीसाठी रिक्षा किंवा बसेस मिळतात.
रस्ते मार्ग – मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरुन आपला प्रवास सुरु करा. वाकड किंवा हिंजवडी फाट्यावरून पुणे शहराच्या दिशेने न जाता, आळंदी रोड पकडा. मोशी किंवा आळंदी मार्गे तुम्ही या गावात प्रवेश करु शकता.
बसचा मार्ग – दादर, ठाणे किंवा वाशीवरुन बस पकडा. पुणे येण्यापूर्वी निगडी किवा हिंजवडी फाट्यावर उतरा आणि इथून चऱ्होलीसाठी स्थानिक टॅक्सी किंवा PMPML बस पकडा.
10 हजारांच्या बजेटमध्ये घेऊ शकता रॉयल सफर! फिरून या असे देश जिथे भारतीय रुपयाला आहे बक्कळ किंमत…
ज्ञानेश्वर महाराज गावात राहून गेलेत
गावाविषयी आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे या गावात संत ज्ञानेश्वर महाराजांची मावशी राहत असल्याचे सांगण्यात येते. यामुळे महाराज अनेकदा गावात येऊन राहायचे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचा साठा देखील जपून ठेवलेला आहे. हेच कारण आहे की हे गाव इतिहास, संस्कृती आणि आध्यात्माचा एक चांगला संगम मानला जातो.