Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चुकूनही करू नका ‘या’ भाज्यांचे सेवन, अपचन होऊन उद्भवू शकतील आतड्यांसंबंधित समस्या

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अपचनाची समस्या उद्भवते. अशावेळी आहारात भाज्यांचे सेवन करावे. मात्र काही भाज्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. जाणून घ्या उन्हाळ्यात कोणत्या भाज्या खाऊ नयेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 30, 2025 | 08:59 AM
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चुकूनही करू नका 'या' भाज्यांचे सेवन

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चुकूनही करू नका 'या' भाज्यांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

शरीरात वाढलेली उष्णता आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, कामाचा तणाव, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरात उष्णता वाढल्यानंतर पचनसंस्था बिघडणे, त्वचा आणि आरोग्यावर अनेक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराला पचन होणाऱ्या हलक्या आणि कमी तेलकट, तिखट पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाज्या किंवा फळांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या भाज्यांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

वातावरणातील बदलांमुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा ‘या’ मसाल्यांचे सेवन

पचनास हलक्या असणाऱ्या भाज्या:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराला पोषण आहाराची आवश्यकता असते. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला पोषण देणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. गवार, कारली, पडवळ, दोडका, आणि भेंडी इत्यादी भाज्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देतात. याशिवाय शरीरातील उष्णता कमी होते. या भाज्यांमध्ये आढळून येणारे फायबर पचनक्रिया निरोगी ठेवतात.

जास्त मसाल्याचे पदार्थ खाऊ नये:

उन्हाळ्यात तेलकट किंवा अतितिखट पदार्थ खाणे टाळावे. जास्त तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बटाटा, वांग किंवा मटारचे सेवन करू नये. या भाज्यांमध्ये असलेले घटक शरीरात उष्णता वाढवतात.

हिरव्या पालेभाज्या:

सर्वच ऋतूंमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या उपलब्ध असतात. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावी ठरते. नियमित पालेभाज्या खाल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिहायड्रेशनच्या समस्येमुळे अनेक लोक त्रस्त आहेत. पालेभाज्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात.

जास्त पाणी असलेल्या भाज्यांचे सेवन करावे:

उन्हाळ्यात काकडी, भोपळा, दुधी भोपळा इत्यादी भाज्यांचे आहारात सेवन करावे. कारण या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते. याशिवाय काकडी खाल्यामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता दूर होतात. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आहारात काकडी आणि इतर पाणी युक्त भाज्यांचे सेवन करावे. या भाज्या शरीराला पोषण देतात.

बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त आहात? मग दैनंदिन आहारात करा ‘या’ पदार्थाचे सेवन, पोट राहील स्वच्छ

लोहयुक्त भाज्यांचे सेवन:

शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता दूर करण्यासाठी दैनंदिन आहारात बीट, पालक इत्यादी अनेक भाज्यांचे सेवन करावे. या भाज्यांच्या सेवनामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होईल आणि आरोग्य सुधारेल. उन्हाळ्यात त्वचा आणि केसांसंबधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बीट, गाजर, पालक इत्यादी भाज्या खाव्यात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do not consume these vegetables during summer days they may cause indigestion and intestinal problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 08:59 AM

Topics:  

  • Green leafy vegetables
  • Health Care Tips
  • Summer Food

संबंधित बातम्या

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी
1

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे
2

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
3

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका
4

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.