
किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय
मुतखडा होण्याची कारणे?
किडनी स्टोन कशामुळे होतो?
किडनी स्वच्छ करण्यासाठी कोणते उपाय करावेत?
किडनी शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. शरीरतील रक्त शुद्ध करणे, लघवीवाटे विषारी घटक बाहेर काढून टाकणे इत्यादी महत्वपूर्ण कामे किडनी करते. पण किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाण्याऐवजी किडनीमध्ये तशीच साचून राहते, ज्याच्या परिणांमुळे किडनी स्टोन, किडनी निकामी होणे, किडनी कॅन्सर यांसारखे गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे किडनीसंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. बदलेली जीवनशैली आणि चुकीचा आहार किडनीचे आजार वाढवण्यास कारणीभूत ठरतात. जगभरातील १२ टक्के लोकांना संपूर्ण आयुष्यात कधीना कधी किडनीच्या गंभीर आजारांची लागण होते. मुतखडा झाल्यानंतर तो पुन्हा एकदा ५ किंवा ६ वर्षानंतर वाढतो. आज आम्ही तुम्हाला किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
किडनी स्टोन झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. पण कालांतराने लक्षणांमध्ये वाढ होते आणि आरोग्य बिघडून जाते. सतत कॅल्शियमच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे किडनीमध्ये हानिकारक घटक साचून राहतात. किडनी स्टोन झाल्यानंतर रक्तातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जात नाही. ते किडनीमध्ये तसेच साचून राहतात. किडनीमध्ये साचून राहिलेल्या खड्यांमुळे खूप जास्त तीव्र वेदना होतात. या वेदना काहीवेळा खूप जास्त असह्य करतात. दैनंदिन आहारात कमीत कमी पाण्याचे सेवन आणि मिठाच्या अतिवापरामुळे किडनीमध्ये विषारी घटक साचून राहतात.
पाण्याचे कमी सेवन
अनुवांशिकता
लठ्ठपणा
अतिप्रथिने असलेला आहार
कॅल्शिअम, ऑक्सलेट आणि युरिक ॲसिड असलेल्या पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन.
लघवी करताना जळजळ होणे
लघवीचा रंग गुलाबी किंवा लाल असणे
लघवीतून रक्त येणे
लघवीला वारंवार जावे लागणे
किडनीला सूज येणे
किडनीमध्ये मुतखडा वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. याशिवाय दैनंदिन आहारात भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे लहान आकाराचा स्टोन लघवीवाटे बाहेर पडून जातो. पण किडनी स्टोनचा आकार मोठा असल्यास तो शस्त्रक्रिया करून काढावा लागतो. याशिवाय रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाणी पिऊन मगच झोपावे. यामुळे लघवी घट्ट होत नाही आणि लघवीमध्ये विषारी घटक किडनीमध्ये साचत नाहीत. फायबरयुक्त पदार्थ, लिंबूवर्गीय फळे, आणि पुरेसे कॅल्शिअम असलेले पदार्थांचा आहारात समावेश करावा. चॉकलेट, चहा, सुका मेवा, बीट इत्यादी पदार्थांचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.
Ans: पाठीच्या किंवा पोटाच्या खालच्या भागात तीव्र वेदना, लघवी करताना वेदना किंवा जळजळ
Ans: शरीरात पुरेसे पाणी नसल्यास लघवीतील खनिजे एकत्र होऊन खडे बनतात.
Ans: दिवसभरात पुरेसे (२-३ लिटर) पाणी पिणे, वेदना कमी करण्यासाठी औषधे