Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग कोमट पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर

पोटात वाढलेला जडपणा कमी करण्यासाठी सकाळी उठून कोमट पाण्यात जिरं आणि ओव्याची पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि आतड्या स्वच्छ होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 07, 2026 | 08:42 AM
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग कोमट पाण्यात मिक्स करा 'हा' पदार्थ

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग कोमट पाण्यात मिक्स करा 'हा' पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

अपचनाची समस्या कशामुळे उद्भवते?
जिरं ओवा खाण्याचे फायदे?
हेल्दी डिटॉक्स ड्रिंक बनवण्याची कृती?

धावपळीची जीवनशैली, कामाचा तणाव, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.याशिवाय आहारात तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे कायमच पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे रोजच्या आहारात सेवन करावे. दिवसाची सुरुवात आनंदी आणि उत्साहाने होण्यासाठी सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होणे आवश्यक आहे. पण बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित होत नाही. आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी आतड्यांमध्ये तशीच साचून राहते. यामुळे पोटात जडपणा जाणवू लागतो.(फोटो सौजन्य – istock)

खवळलेले पित्त होईल कायमचे शांत! अ‍ॅसिडिटी वाढल्यानंतर आठवड्यातून एकदा करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल आराम

पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे पोटात वेदना, ऍसिडिटी, अपचन आणि गॅसची समस्या उद्भवते. वारंवार आतड्यांमध्ये जमा होणाऱ्या गॅसमुळे पचनक्रियेवर जास्तीचा तणाव येतो. खाल्लेले अन्नपदार्थ पचन करण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात कोणता पदार्थ मिक्स करून प्यावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच पचनाच्या समस्या कधीही उद्भवणार नाही.

ओवा आणि जिऱ्याचे सेवन:

प्रत्येक स्वयंपाक घरात ओवा आणि जिरं असतंच. जिऱ्याचा वापर जेवणाला फोडणी देण्यासाठी केला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढते आणि सुगंध वाढण्यास मदत होते. डाळ किंवा इतर कोणताही पदार्थ बनवताना जिऱ्याचा वापर करावा. पोट दुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी ओवा खाल्ला जातो. या दोन्ही मसाल्यांच्या पदार्थांमध्ये पाचक गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळून येतात. ओव्यामध्ये असलेले घटक पोटातील पाचक रसायन सक्रिय करतात. यामुळे गॅस आणि अपचन होत नाही. शरीरातील मेटाबॉलिझ्म वाढवण्यासाठी आणि पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी नियमित जिरं आणि ओव्याचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमधील घाण सहज बाहेर पडून जाईल.

ओवा आणि जिऱ्याचे पाणी कसे बनवावे?

ओवा जिऱ्याचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा जिरं आणि ओवा मिक्स करून उकळवण्यासाठी ठेवावे. त्यानंतर पाण्याला उकळी येऊन पाणी अर्धा झाल्यानंतर गॅस बंद करा. तयार केलेले पाणी गाळून उपाशी पोटी सेवन करावे. याशिवाय जिरं आणि ओव्याची पावडर कोमट पाण्यात मिक्स करून नियमित प्यायल्यास महिनाभरात फरक दिसून येईल. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या बऱ्याच समस्यांपासून आराम मिळेल आणि पचनसंस्था कायमच सक्रिय राहील. वारंवार पोट फुगण्याची समस्या उद्भवत असेल तर जिरा आणि ओव्याचे पाणी प्यावे.

कोबीतील किड्यामुळे 18 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, कसा घुसतो मेंदूत किडा; कसे स्वतःला वाचवाल

सकाळी उठल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून गेल्यास संपूर्ण दिवस सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाने जातो. त्यामुळे आहारात कायमच जास्त फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटाला आराम मिळतो. आतड्यांमध्ये आणि शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. आहारात मेथी, पालक, तांदूळ, पेरू, पपई, सफरचंद आणि संत्री, गव्हाचे पीठ, ओट्स, बाजरी किंवा नाचणी इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. फायबर असलेले पदार्थ शरीरातील घाण बाहेर काढून टाकतात आणि शरीर स्वच्छ ठेवतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बद्धकोष्ठता म्हणजे काय?

    Ans: बद्धकोष्ठता म्हणजे आतड्याची हालचाल कमी होणे, शौचास कठीण आणि कमी प्रमाणात होणे, आणि पोट साफ न झाल्यासारखे वाटणे.

  • Que: ऍसिडिटी म्हणजे काय?

    Ans: पोटातील ऍसिड अन्ननलिकेत परत आल्याने छातीत जळजळ होते.

  • Que: अपचनाची समस्या कशामुळे उद्भवते?

    Ans: चुकीच्या खाण्याच्या सवयी, मसालेदार/तेलकट अन्न.

Web Title: Do you have trouble having a proper bowel movement after waking up in the morning then mix this ingredient in lukewarm water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • acidity
  • gut health
  • Health Care Tips
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

आवडीने खाल्ला जाणारा मुळा ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक, चुकूनही करू नका सेवन
1

आवडीने खाल्ला जाणारा मुळा ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक, चुकूनही करू नका सेवन

खवळलेले पित्त होईल कायमचे शांत! अ‍ॅसिडिटी वाढल्यानंतर आठवड्यातून एकदा करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल आराम
2

खवळलेले पित्त होईल कायमचे शांत! अ‍ॅसिडिटी वाढल्यानंतर आठवड्यातून एकदा करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल आराम

बुधवार-गुरुवारी मृत्यूचा सर्वाधिक धोका! अचानक मरणाचे प्रमाण घरीच जास्त, जाणून घ्या सविस्तर माहिती
3

बुधवार-गुरुवारी मृत्यूचा सर्वाधिक धोका! अचानक मरणाचे प्रमाण घरीच जास्त, जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबईकरांच्या आरोग्याचा कोंडमारा! नवीन वर्षाच्या सुरुवातीला पडलेल्या पाऊसामुळे अनेकांना श्वसनविकारांचा त्रास
4

मुंबईकरांच्या आरोग्याचा कोंडमारा! नवीन वर्षाच्या सुरुवातीला पडलेल्या पाऊसामुळे अनेकांना श्वसनविकारांचा त्रास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.