
पायांना सतत खाज येते? नायट्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय, जळजळ होईल कमी
पावसाळ्यात पायांमध्ये बुरशीजन्य संसर्ग का वाढतो?
बुरशीजन्य संसर्ग कमी करण्यासाठी उपाय?
संसर्ग टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी?
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आवर्जून उद्भवणाऱ्या समस्या म्हणजे पाय कुजणे किंवा बोटांमध्ये जखमा होणे. ओले शूज, दमट हवामान, पायांवरील सततचा ओलसरपणा इत्यादी कारणांमुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. यामुळे पायांना खाज येणे, त्वचा लाल होणे, कातडी निघणे, जळजळ आणि बोटांच्या मधोमध अस्वस्थता जाणवणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. Athlete’s Foot किंवा Tinea Pedis झाल्यानंतर पायांमध्ये खूप जास्त जळजळ होते. पाय जमिनीवर टेकवणे सुद्धा अवघड होऊन जाते. अशावेळी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम किंवा अँटीफंगल क्रीम आणून पायांवर लावल्या जातात. पण चुकीच्या पद्धतीने अँटीफंगल क्रीमचा वापर केल्यास पायांवर जखमा आणखीनच वाढण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वातावरणात बदल होतो. सगळीकडे गारवा निर्माण झाल्यामुळे गर्मीपासून काही प्रमाणात सुटका मिळते. पण या दिवसांमध्ये त्वचेसंबंधित असंख्य वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. दीर्घकाळ पाय ओले राहिल्यामुळे त्वचेचा नैसर्गिक संरक्षक स्तर कमजोर होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे बुरशी सहजपणे त्वचेच्या आत प्रवेश करते. हवा खेळती न राहणारे बंद शूज, ओले झालेले मोजे किंवा तासनतास ओल्या जागी उभे राहिल्यामुळे पायांमध्ये जखमा होण्याची शक्यता असते. ओलसरपणा, जिम, स्विमिंग पूल किंवा दुसऱ्याचे टॉवेल आणि चप्पल वापरल्याने बुरशीचे जिवाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात.
पावसाळ्यात पायांमध्ये वाढलेला संसर्ग कमी करण्यासाठी योग्य ते घरगुती उपाय करावेत. पाय सौम्य साबणाने स्वच्छ धुवून नंतर व्यवस्थित कोरडे करून घ्या. पायांच्या बोटांमधील जागा पूर्णपणे कोरडी आणि स्वच्छ असणे फार आवश्यक आहे. मोजे नेहमी स्वच्छ घालावेत. चपला किंवा सँडल्सचा वापर करताना त्यातील हवा कायमच खेळती राहावी. पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये टॉवेल, मोजे आणि चप्पल पूर्णपणे वैयक्तिक ठेवाव्यात. शूजमध्ये ‘एंटीफंगल पावडर’ वापरल्यास मदत होते.
टर्बिनाफाइन, क्लोट्रिमाझोल, मायकोनाझोलयुक्त क्रीम्स बुरशीची वाढ थांबवून पायांमध्ये वाढलेली खाज आणि जळजळ कमी होते. पायांमध्ये वाढलेल्या इन्फेक्शनवर वेळीच लक्ष न दिल्यास जखमा पाण्याच्या नखांपर्यंत पोहचण्याची जास्त शक्यता असते. संसर्ग झाल्यानंतर खाजवल्याने त्वचा दुखावली जाते, ज्यामुळे जंतू आणखीनच वाढतात. पायांमध्ये झालेल्या जखमा कमी करण्यासाठी खोबरेल तेल किंवा मिठाच्या पाण्यात पाय बुडवून ठेवावे. यामुळे जखमांवरील जंतू नष्ट होण्यास मदत होते.
Ans: पायांमध्ये बुरशीजन्य संसर्ग (नायटा), जास्त घाम येणे, ओलसरपणा, अॅलर्जी किंवा त्वचा कोरडी पडणे यामुळे सतत खाज येऊ शकते.
Ans: टी ट्री ऑइल, खोबरेल तेल, हळद, कडुनिंबाची पाने, अॅलोवेरा जेल यांसारखे नैसर्गिक उपाय काही प्रमाणात खाज आणि जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात. मात्र हे उपाय वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाहीत.
Ans: योग्य उपचार, स्वच्छता आणि पाय कोरडे ठेवण्याची सवय यामुळे नायटा पूर्णपणे बरा होऊ शकतो. संसर्ग वारंवार होत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.