Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तात वाढलेल्या साखरेमुळे अंगाला सतत खाज येते? मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित फळांचे सेवन करावे. फळे खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात आणि फळांमध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. जाणून घ्या मधुमेहाची लक्षणे आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती फळे खावीत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 11, 2026 | 08:09 AM
रक्तात वाढलेल्या साखरेमुळे अंगाला सतत खाज येते? मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आहारात करा 'या' फळांचा समावेश

रक्तात वाढलेल्या साखरेमुळे अंगाला सतत खाज येते? मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आहारात करा 'या' फळांचा समावेश

Follow Us
Follow Us:

मधुमेह वाढण्याची कारणे?
मधुमेह झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती फळे खावीत?

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये मधुमेह, हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शरीराला तरुण वयात कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर जीवन गोळ्या औषधांचे सेवन करून काढावे लागते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी वयाच्या ६० व्या वर्षानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवायच्या, मात्र जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे तरुण वयात आजारांना सामोरे जावे लागते. मधुमेहासारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजाराची लागण झाल्यानंतर संपूर्ण आयुष्यभर औषधांचे सेवन करावे लागते. मधुमेह हा कधीच न बरा होणारा आजार आहे. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.(फोटो सौजन्य – istock)

Voice Change: आवाजात अचानक बदल होतोय? दुर्लक्ष करु नका, शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत

मधुमेह झाल्यानंतर शरीरात इन्सुलिन तयार होण्यास अडथळा येतो किंवा शरीर त्याचा योग्य वापर करत नाही, ज्याच्या परिणामामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. मधुमेहाचे प्रमुख दोन प्रकार आहेत. टाइप १ मधुमेह, टाइप २ मधुमेह यापैकी कोणत्याही मधुमेहाची लागण झाल्यास शरीराला हानी पोहचते. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास शरीरावर जखमा होतात. या जखमा पूर्णपणे बऱ्या न झाल्यामुळे बाधित अवयव कापून टाकावा लागतो. चला तर जाणून घेऊया मधुमेह झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती फळे खावीत? याबद्दल सविस्तर माहिती.

रक्तातील साखर वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • वारंवार लघवीला होणे
  • अंगाला सतत खाज येणे
  • सतत तहान लागणे
  • अचानक वजन कमी होणे किंवा वाढत जाणे.
  • हाता-पायांना मुंग्या येणे किंवा सुन्नपणा जाणवणे
  • जखम किंवा ओरखडे हळूहळू भरणे

रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती फळे खावीत:

दैनंदिन आहारात फळांचे नियमित सेवन करावे. फळांमध्ये असलेले फायबर, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स शरीराला आवश्यक पोषक घटक देतात. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिहायड्रेशनच्या वाढत्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित पाणीदार फळांचे सेवन करावे. यामध्ये असलेले घटक शरीर नैसर्गिकरित्या हायड्रेट करण्यास मदत करतात. फळांमध्ये फ्रुक्टोज, ग्लुकोज आणि सुक्रोज यांसारखे नैसर्गिक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. फळांमध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. याउलट आरोग्य कायमच चांगले राहते.

Women’s Health: वयाच्या 35 शी नंतर महिलांनी आहारात समाविष्ट करावेत ‘हे’ सुपरफूड्स; आरोग्य राहील तंदुरुस्त

सफरचंदामध्ये विद्रव्य फायबर आणि पेक्टिन मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. पेरूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू वरदान मानला जातो. रक्तातील साखरेला स्थिर ठेवण्यासाठी आणि जुनाट बद्धकोष्ठतेपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पेरूचे सेवन करावे. संत्री, मोसंबी यांसारख्या फळांमध्ये विटामिन ‘सी’ आणि फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते. रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी आणि रक्तातील सारखं नियंत्रणात ठेवण्यासाठी आंबट फळांचे सेवन करावे. जांभूळ, स्ट्रॉबेरी किंवा ब्ल्यूबेरी यांसारख्या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप जास्त असतात. इन्सुलिनची संवेदनशील सुधारण्यासाठी स्ट्रॉबेरी किंवा ब्ल्यूबेरी यांसारख्या फळांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रक्तातील साखर वाढल्यामुळे अंगाला खाज येऊ शकते का?

    Ans: होय, काही लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यास त्वचा कोरडी होणे, डिहायड्रेशन किंवा त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढल्यामुळे खाज जाणवू शकते.

  • Que: मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी कोणती फळे खावी?

    Ans: पेरू, सफरचंद, पपई, बेरीज प्रकारातील फळे, संत्री यांसारखी फायबरयुक्त फळे संतुलित प्रमाणात आहारात घेता येतात.

  • Que: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात काय बदल करावे?

    Ans: फायबरयुक्त पदार्थ, संतुलित आहार, कमी प्रक्रिया केलेले पदार्थ आणि नियमित आहाराच्या सवयी ठेवणे उपयुक्त ठरू शकते.

Web Title: Does high blood sugar cause constant itching include these fruits in your diet to reduce the risk of diabetes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • diabetes
  • Health Care Tips
  • healthy fruits

संबंधित बातम्या

रात्री झोपण्याआधी दुधात मिक्स करून प्या ‘ही’ गुणकारी पावडर, थकवा- अशक्तपणापासून मिळेल कायमचा आराम
1

रात्री झोपण्याआधी दुधात मिक्स करून प्या ‘ही’ गुणकारी पावडर, थकवा- अशक्तपणापासून मिळेल कायमचा आराम

Women’s Health: वयाच्या 35 शी नंतर महिलांनी आहारात समाविष्ट करावेत ‘हे’ सुपरफूड्स; आरोग्य राहील तंदुरुस्त
2

Women’s Health: वयाच्या 35 शी नंतर महिलांनी आहारात समाविष्ट करावेत ‘हे’ सुपरफूड्स; आरोग्य राहील तंदुरुस्त

Voice Change: आवाजात अचानक बदल होतोय? दुर्लक्ष करु नका, शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत
3

Voice Change: आवाजात अचानक बदल होतोय? दुर्लक्ष करु नका, शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत

Diabetes: प्री-डायबिटीज म्हणजे काय?  मधुमेह होण्याआधी शरीर देतं ‘हे’ सायलेन्ट संकेत; वेळीच व्हा सावध
4

Diabetes: प्री-डायबिटीज म्हणजे काय? मधुमेह होण्याआधी शरीर देतं ‘हे’ सायलेन्ट संकेत; वेळीच व्हा सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.