फोटो सौजन्य - Social Media
आयुष्यात प्रेम महत्वाचे असते. आपल्याला आयुष्यात अशा व्यक्तीचीच गरज भासतेच जो आपला असतो. आपल्यासाठी प्रत्येकवेळी उपलब्ध असतो. आपल्यावर जीवापाड प्रेम करत असतो. इतके प्रेम ज्याची जाणीव आपल्याला पहिल्यांदा होत असतो. त्या व्यक्तीकडे आणि त्याच्या आपल्यासाठी असणाऱ्या कृतींवरून आपल्याला प्रेमाच्या व्याख्येची जाणीव होते. ‘प्रेम म्हणजे नक्की काय असते?’ याची व्याख्या ती व्यक्ती असते. पण कधी कधी प्रेमाच्या ओघात व्यक्ती स्वतःला विसरून बसतो.
प्रेमात समोरचा व्यक्ती किंवा आपला जोडीदार महत्वाचा असतोच. पण तितके महत्वाचे स्वतःचे अस्तित्वही असते. प्रेमाचे अस्तित्व आणता आणता स्वतःचे अस्तित्व गमावणे टाळले पाहिजे. जर समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर प्रेम असेल तर त्याला तुमच्या कृतींनी काहीच फरक पडणार नाही. जर प्रेम असेल तर तो व्यक्ती तुमचाच राहणार आहे, यात तिळमात्र शंका घेण्याची गरज नसते.
आपल्या जोडीदाराला काय हवंय? काय नकोय? याची खात्री करत असताना तुम्हाला स्वतःला काय हवंय? याचे उत्तर शोधण्यात मागे पडू नका. जोडीदाराला समजवा की,’मी तुझ्या आनंदासाठी आहेच. तुझे आनंद ज्यात आहे तेथे माझाही आनंद आहे. पण एखादी गोष्ट मला पटत नाही आहे.” असे त्याला समजवून सांगा, त्या व्यक्तीला तुमच्या भावनांची कदर असेल तर तो व्यक्ती नक्कीच एक पाऊल मागे येईल. नेहमी तुम्हीच एक पाऊल मागे जाणे टाळा. कधी तरी तुमच्या जोडीदारालाही मागे जाण्याची संधी द्या आणि हो! यात कसलाही कमीपणा नसतो.
आपल्या जोडीदाराच्या स्वप्नांना नेहमी पाठिंबा द्या. आधार द्या. पण स्वतःचे स्वप्न विसरू नका. आपल्या जोडीदाराच्या स्वप्नांसाठी त्याला वेळ द्या, पण तो तुमच्या स्वप्नांसाठी किती गंभीर आहे? याचीही जाणीव असू द्या. कधी कधी आपण प्रेमात इतके गुंतून जातो की आपल्याला ‘नाह’ हा शब्दच उच्चारता येत नाही. या शब्दाला आपण विसरून जातो. असे असेल तर आधी नाही म्हणण्यास शिका. प्रत्येक गोष्टीला होकार देणे टाळा. एखादी गोष्ट पटत नसेल तर सरळ नाही म्हणा. स्वतःचे आरोग्य जपा. मानसिक आरोग्य जपा. एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर जोडीदाराला ते सांगून टाका आणि मन हलके करा. दडपण घेऊन बसलात तर आरोग्यावर परिणाम होईल.






