Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे सेवन, पोटात साचलेली घाण होईल स्वच्छ

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. यामुळे पोटात दुखणे, अपचन, गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 09, 2025 | 08:53 AM
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ओव्याचे पाण्याचे सेवन

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ओव्याचे पाण्याचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

दैनंदिन आयुष्यात जगताना निरोगी आरोग्यासाठी सतत काहींना काही करत असतात. मात्र वातावरणात होणारा बदल, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, चुकीच्या वेळी झोपणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. यामुळे पोटात दुखणे, अपचन, गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या आहारात शरीराला पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन करावे. सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. वाढलेले कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी घातक ठरते.(फोटो सौजन्य – iStock)

लघवी करताना जळजळ होते? किडनी स्टोनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन

प्रत्येकाच्या घरात ओवा हा पदार्थ असतोच. ओवा खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, लोह आणि पोटॅशियम इत्यादी पौष्टिक घटक असतात, जे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ओव्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आतड्यांचे कार्य सुधारेल.

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ओव्याचे पाण्याचे सेवन:

वजन राहील नियंत्रणात:

वाढलेले वजन, लठ्ठपणा इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. ओव्याचे पाणी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत करते. याशिवाय या पाण्याच्या सेवनामुळे चयापचय वाढतो, ज्यामुळे पोटावर आणि हातांवर वाढलेला चरबीचा घेर जळून जाण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ओव्याच्या पाण्याचे नियमित सेवन करावे.

पचनसंस्था सुधारते:

शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. ओव्याचे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले मल बाहेर पडून जातो. याशिवाय यामध्ये असलेले फायबर शरीराची भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. पचनक्रिया बिघडल्यानंतर ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे.

रोगप्रतिकारशक्ती सुधारते:

साथीचे आजार किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी ओव्याच्या पाण्याचे नियमित सेवन करावे. ओव्याच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती झपाट्याने वाढते. गंभीर आजार आणि साथीच्या आजारांपासून सुटका मिळ्वण्यासाठी ओव्याचे पाणी प्यावे.

किडनी खराब झाल्यानंतर किती वेळ जगू शकतो माणूस? खराब होण्याअगोदर दिसतात ‘ही’ लक्षणे

मधुमेहासाठी प्रभावी:

रक्तात वाढलेली साखर आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ओव्याचे पाणी प्यावे. ओव्याचे पाणी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. तसेच यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म शरीरातील दाह कमी करण्यासाठी मदत करते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Drink ajwain water on an empty stomach after waking up in the morning home remedies for acidity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 08:53 AM

Topics:  

  • acidity
  • Health Care Tips
  • stomach health

संबंधित बातम्या

गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत
1

गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक
2

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम
3

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम

‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार
4

‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.