Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात कितीही मीठ टाकलं तरी अळणीच लागत? मिठाचे अतिसेवन केल्यामुळे शरीरावर दिसून येतात ‘हे’ दुष्परिणाम

दैनंदिन आहारात अतिप्रमाणात मीठ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय शरीरात अनेक बदल दिसून येतात. जाणून घ्या मीठ खाल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 13, 2025 | 09:17 AM
मिठाचे अतिसेवन केल्यामुळे शरीरावर दिसून येतात 'हे' दुष्परिणाम

मिठाचे अतिसेवन केल्यामुळे शरीरावर दिसून येतात 'हे' दुष्परिणाम

Follow Us
Close
Follow Us:

जेवणातील पदार्थांची चव वाढवण्यासाठी आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मीठ. मीठाशिवाय पदार्थाची चव वाढत नाही. स्वयंपाक घरात इतर कोणतेही पदार्थ उपलब्ध नसले तरीसुद्धा मीठ हे असतंच. मिठाशिवाय पदार्थाला अजिबात चव लागत नाही. सर्वच पदार्थांमध्ये योग्य प्रमाणात मीठ वापरले जाते. पण काहींना खूप जास्त मीठ लागते. जेवणात कितीही मीठ टाकले तरीसुद्धा त्यांना मीठ कमीच वाटते. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे मीठ उपलब्ध आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अतिप्रमाणात मीठ खाल्यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. अतिप्रमाणात मीठ खाल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

‘ही’ एक वस्तू नैसर्गिक ब्रश आहे; आठवड्यातून दोनदा तरी याने दात घासायलाच पाहिजे

काहींना खूप जास्त मीठ खाण्याची सवय असते. जेवणात मीठ टाकल्यानंतर सुद्धा काहींना मीठ कमीच वाटते. हे केवळ तोंडाच्या चवीमुळे नाही तर आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांचे संकेत सुद्धा असू शकतात. गरजेपेक्षा जास्त मीठ खाल्यामुळे शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. मीठ खाल्यामुळे शरीराच्या संवेदनशीलतेवर परिणाम दिसून येतो. अतिप्रमाणात मीठ खाल्यामुळे शरीरात जास्तीचे पाणी साचून राहते. यामुळे अंगाला सूज येणे, अतिरिक्त वजन वाढणे, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवतात. शरीरात वाढलेल्या उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार आणि मूत्रपिंडाचे आजार होण्याची शक्यता असते.

शरीरात सोडियमचे प्रमाण कमी झाल्यानंतर तर काही वेळा मानसिक ताण, थकवा, हार्मोनल बदल इत्यादी अनेक गोष्टींमुळे आहारात मीठ जास्त खाण्याची इच्छा निर्माण होते. सुरुवातीला या सवयी अतिशय सामान्य वाटतात. पण कालांतराने शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. त्यामुळे शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात मीठ खावे. शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवतात.आहारात खाल्ले जाणारे मीठ आरोग्यासाठी जितके चांगले आहे तितकेच वाईट सुद्धा आहे. त्यामुळे आहारात आवश्यकता असेल तेवढेच मीठ खावे.

दीर्घकाळ Kiss करणे ओठांवर पडू शकते भारी, इंटरनेटवर का घेतला जातोय Deep Kissing उपायांचा जास्त शोध?

FAQs (संबंधित प्रश्न)

मीठ म्हणजे काय?

मीठ हे एक खनिजाचे नैसर्गिक स्फटिक रूप आहे, जे प्रामुख्याने सोडियम क्लोराईड पासून बनते.हे एक रासायनिक दृष्ट्या लवण (salt) आहे आणि जगभरातील अनेक समाजांमध्ये अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी वापरले जाते.

मिठाचे प्रकार:

टेबल सॉल्ट, समुद्री मीठ, सैंधव मीठ, काळे मीठ इत्यादी मिठाचे प्रकार आहेत.

मिठाच्या सेवनाचे तोटे?

जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी झाल्यास मेंदूला हानी पोहोचू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Due to excessive consumption of salt the body shows these side effects health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • side effect

संबंधित बातम्या

वर्षाच्या बाराही महिने सर्दी होऊन नाकातून पाणी येते? मग आजच आहारातून काढून टाका ‘हे’ पदार्थ, सर्दी वाढण्यास ठरतात कारणीभूत
1

वर्षाच्या बाराही महिने सर्दी होऊन नाकातून पाणी येते? मग आजच आहारातून काढून टाका ‘हे’ पदार्थ, सर्दी वाढण्यास ठरतात कारणीभूत

५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे
2

५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ
3

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ

सतत खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास होतो? हंता व्हायरसने वाढवले संपूर्ण जगाचे टेन्शन,’ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध
4

सतत खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास होतो? हंता व्हायरसने वाढवले संपूर्ण जगाचे टेन्शन,’ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.