
चैत्र नवरात्री उत्सवा दरम्यान उपवास करताना 'या' पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी, शरीराला मिळेल ऊर्जा
गुढी पाडवा आणि चैत्र नवरात्र जवळ येत आहे. चैत्र नवरात्रीला देखील शारदीय नवरात्रीप्रमाणे अनेक जण नऊ दिवस उपवास करतात, उपवास करताना काही जण खूप कडक उपवास करतात तर काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. मात्र, योग्य काळजी न घेतल्या अशक्तपणा, थकवा जाणवू शकतो. उपवासात काय खाणार काय नाही, नवरात्रीतील योग्य आहाराबाबत जाणून घेऊया. उपवास करणे शरीराला चांगले असते. यामुळे बॉडी डिटॉक्स होते. मात्र, नवरात्रीचे उपवास फार कठीण असतात. हे सलग नऊ दिवस करायचे असतात. उपवासात शरीराला पोषण मिळेल असा एकदम हलका आहार घ्यावे. विशेष करून फळे खावीत. त्यातही चैत्र महिन्यात उन्हाळा असल्याने टरबूज-खरबूज यांसारखी पाणीदार फळे खावीत.(फोटो सौजन्य – istock)
विना LPG घरी कोणकोणते पदार्थ बनवले जाऊ शकतात? न शिजवता तयार होणारे हे आहेत हेल्दी अन् टेस्टी ऑप्शन्स
उपवास करताना पाणी योग्य प्रमाणात पिणे आवश्यक आहे. पाणी तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवेल. त्यामुळे तुम्हाला चक्कर येणार नाही, डोकेदुखी होणार नाही. तसेच अशक्तपणा जाणवणार नाही.
उपवासाच्या काळात सबरत किंवा फळांचा रस घेणे चांगले असते. यामुळे तुम्हाला भूकेची जाणीव होणार नाही. लिंबू सरबत, ताज्या फळांचा रस यामुळे अशक्तपणा होणार नाही.
उपवासात दूध आणि दुधाचे पदार्थ घेणे चांगले असते. यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते. तसेच दूध हे शरीराला शक्ती प्रदान करते. तसेच त्यात अनेक व्हिटामिन्स असतात. हे सर्व व्हिटामिन दुधातून मिळतात.
उपवास करताना, खाण्याबाबत ध्यास लागल्यास तुमची भूक तीव्र होऊ शकते. जेव्हा तुमचे मन अध्यात्मिक कार्यात गुंतून जाते तेव्हा उपवासाचा अनुभव खूपच नितळ आणि अधिक सहज बनतो. अध्यात्मिक विधी किंवा ध्यान यासारख्या अर्थपूर्ण कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतल्याने तुमचे लक्ष अन्नापासून दूर होण्यास मदत होऊ शकते.दिव्यत्वाशी तादात्म्य ठेवल्याने आणि आपल्या चेतनेच्या उत्थानात व्यस्त राहल्याने, उपवास हा एका आव्हानात्मक परीक्षेऐवजी अधिक सुसंवादी आणि सहज अनुभव असू शकतो.