
आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित खा 'ही' फळे, सकाळी जोर न लावता पोट होईल स्वच्छ
आतडे स्वच्छ करण्यासाठी उपाय?
बद्धकोष्ठतेची कारणे?
पचनक्रिया सुधारण्यासाठी घरगुती उपाय?
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास संपूर्ण दिवस कंटाळवाणा आणि चिडचिडा जातो. शरीरात साचून राहिलेल्या घाणीमुळे आरोग्य बिघडून जाते. बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होण्यासाठी खूप जास्त जोर लावावा लागतो. पण तरीसुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. आतड्यांमध्ये जमा झालेल्या घाणीमुळे ऍसिडिटी, गॅस, अपचन आणि पोटाचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. तसेच आतड्यांमध्ये चिकटलेल्या घाणीमुळे पोटाच्या डाव्या बाजूला काहीवेळा वेदना होतात. बद्धकोष्ठता झाल्यानंतर काहीवेळा मूळव्याध सुद्धा होतो. त्यामुळे शौचातुन रक्त पडणे किंवा मूळव्याध होऊन शरीराच्या आतील भागाला सूज येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये चिकटलेला विषारी मल बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
किवी हे फळ किमतीने अतिशय महाग आहे. पण बद्धकोष्ठतेवर अतिशय रामबाण मानले जाते. यामध्ये असलेले ॲक्टिनिडिन नावाचे एक नैसर्गिक एन्झाइम आढळून येते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. शरीराची पचनक्रिया वेगाने करण्यासाठी किवीचे सेवन करावे. कीवीमध्ये विरघळणारे फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमधील मल मऊ होऊन सहज बाहेर पडून जातो. ज्यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते. जुनाट बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी किवी खावी.
आंबटगोड चवीचा पेरू विटामिनचा महत्वपूर्ण स्रोत मानला जातो. हे फळ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक पेरू खाल्ल्यास पोट सुद्धा भरलेले राहील आणि आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते. यामध्ये असलेले फायबर आतड्यांमधील मल सहज बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. पेरू खाताना त्यातील बिया अजिबात फेकून देऊ नका. बिया खाल्ल्यामुळे शरीराला महत्वपूर्ण फायदे होतात. नियमित एक पेरू खाल्ल्यास पोट स्वच्छ होईल.
आठवड्यातून दोनदा सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी पपईचे सेवन करावे. पपई खाल्ल्यामुळे अन्नातील प्रथिनांचे पचन सुधारण्यास मदत होते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. पपईमध्ये असलेले पेपेन नावाचे पाचक एन्झाइम आणि फायबर आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. यासोबतच दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि फळांचे सेवन करावे. अन्न पदार्थ सहज पचन होण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते.
Ans: सतत पोट फुगणे, गॅस किंवा बद्धकोष्ठता.
Ans: फळे, भाज्या, कडधान्ये आणि संपूर्ण धान्य.
Ans: अतिप्रमाणात साखर, कमी फायबर असलेला आहार, मानसिक ताण, अपुरी झोप आणि अँटीबायोटिक्सचा अतिवापर यामुळे आतड्याचे आरोग्य खराब होऊ शकते.