Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात साचलेले पाणी आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास शरीरातील पाणी होईल कमी

शरीरात साचून राहिलेले पाणी संपूर्ण शरीर पोखरून काढते. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात पाणी झाल्यानंतर कोणते घरगुती उपाय करावे जाणून घ्या सविस्तर

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 19, 2025 | 02:33 PM
शरीरात साचलेले पाणी आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक!

शरीरात साचलेले पाणी आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक!

Follow Us
Close
Follow Us:

शरीरात पाणी झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. शरीरात साचलेल्या पाण्यामुळे वजन वाढू लागते. अनेकांना सामान्य वाटणारी समस्या दुर्लक्ष केल्यास आणखीनच गंभीर आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. शरीरात पाण्याचे प्रमाण वाढल्यानंतर अंगाला सूज येणे, जडपणा आणि अचानक वजन वाढणे इत्यादी समस्या दिसून येतात. शरीरात पाण्याचे प्रमाण वाढण्यामागे अनेक कारण आहेत. चुकीची जीवनशैली, आहारात जास्त मीठ खाणे, हार्मोनल बदल, कमी हालचाल किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या कारणीभूत असतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात कोणत्या सवयींमध्ये बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी आणि पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स राहणार क्वारंटाइन! शरीरात वाढू शकतो ‘या’ भयानक आजारांचा धोका

कमीत कमी मीठाचे सेवन:

रोजच्या आहारात अनेकांना खारट जेवण जेवण्याची सवय असते. पण आहारात जास्त मीठ खाणे चुकीचे आहे. मिठामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रोजच्या आहारात कमीत कमी खावे. याशिवाय आहारात तळलेले किंवा प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. शरीरात सोडियमची पातळी वाढल्यानंतर शरीर पाणी साचणे किंवा अंगाला सूज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. तेलकट पदार्थ खाण्याऐवजी ताजी फळे, भाज्या आणि काजू इत्यादी पौष्टिक पदार्थ खावेत.

पाण्याचे सेवन करणे:

शरीर निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. मात्र शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर विषारी घटक तसेच साचून राहतात आणि ज्यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवात पाणी होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाणी प्याल्यामुळे शरीर हायड्रेट राहते, पचनक्रिया सुधारते, त्वचा सुधारते.

हर्बल टी:

सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी हर्बल चहाचे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. त्यामुळे तुम्ही नियमित ग्रीन टी, पुदिना चहा किंवा आल्याच्या चहाचे सेवन करून शकता. सकाळी उठल्यानंतर अनेक लोक ग्रीन टी चे सेवन करतात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील चयापचय वाढवतात आणि पाण्याचे प्रमाण कमी करतात. शरीरात साचून राहिलेले पाणी कमी करण्यासाठी नियमित ग्रीन टी प्यावी.

किडनी आतून सडल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ भयानक लक्षणे, वेळीच सावध होऊन घ्या डॉक्टरांचा सल्ला

व्यायाम आणि योगासने करावीत:

सकाळी उठल्यानंतर धावपळीमधून 30 मिनिटं व्यायाम आणि योगासने करण्यासाठी काढावीत. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्रिकोणासन, पवनमुक्तासन आणि भुजंगासन केल्यामुळे शरीराचे वाढलेले वजन कमी होते. या आसनांचा नियमित सराव केल्यास शरीरात साचलेले पाणी कमी होऊन अंगाला आलेली सूज कमी होऊन जाईल. 20-30 मिनिटे चालणे, सायकल चालवणे इत्यादी व्यायाम प्रकार आवश्य करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Excess water retention in the body can be harmful try these home remedies to reduce it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 02:33 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

मनुष्यबळ कमतरतेमुळे डासजन्य आजारांमध्ये वाढ! मंजूर २,२०० पदांपैकी सुमारे ४० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती
1

मनुष्यबळ कमतरतेमुळे डासजन्य आजारांमध्ये वाढ! मंजूर २,२०० पदांपैकी सुमारे ४० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी
2

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

वयाच्या तिशीनंतर सुधृढ राहण्यासाठी महिलांनी आवश्यक करायला हव्यात ‘या’ चाचण्या, दीर्घकाळ राहाल हेल्दी
3

वयाच्या तिशीनंतर सुधृढ राहण्यासाठी महिलांनी आवश्यक करायला हव्यात ‘या’ चाचण्या, दीर्घकाळ राहाल हेल्दी

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे
4

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.