
कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश आणि ताजतवटवीत! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे कडक ऊन पडते. कडक उन्हात कुठेही बाहेर गेल्यानंतर अंगाची काहिली होते आणि आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. कामानिमित्त बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरावरील त्वचा, चेहरा पूर्णपणे लाल होऊन जातो तर काहींच्या अंगावर लाल रॅश येतात. सतत येणाऱ्या घामामुळे चेहऱ्यावरील चमक कमी होऊन जाते. धूळ, माती आणि प्रदूषणाच्या ठिकाणी जास्त वेळ राहिल्यामुळे त्वचेचे गंभीर नुकसान होते आणि चेहऱ्यावर पिंपल्स, फोड आणि बारीक मुरूम येण्याची जास्त शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स फुटून गेल्यानंतर त्यांचे काळे डाग चेहऱ्यावर तसेच राहतात. हे डाग घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या टोनर किंवा इतर स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण तरीसुद्धा फारसा फरक त्वचेवर दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)
सर्वच ऋतूंमध्ये त्वचेसंबंधित असंख्य समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केमिकल युक्त स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि त्वचा अतिशय चमकदार दिसते. आज आम्ही तुम्हाला काकडी आणि तुळशीच्या पानांचा वापर करून टोनर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा टोनर रात्री झोपण्याआधी किंवा मेकअप करण्याआधी नियमित वापरल्यास चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स कमी होण्यासोबतच उन्हात गेल्यानंतर सुद्धा त्वचा फ्रेश आणि चमकदार दिसेल. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी आणि तुळशीच्या पानांपासून बनवलेले टोनर वापरावे.
टोनर लावण्याआधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्वचा कोरडी करून चेहऱ्यावर टोनर स्प्रे करा. यामुळे त्वचा खूप जास्त हायड्रेट आणि ग्लोइंग राहील. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुठेही बाहेर जाताना मेकअप करण्याआधी तयार केलेले टोनर लावावे. त्यानंतर मेकअप केल्यास त्वचेवर जास्त घाम येणार नाही. टोनर लावल्यानंतर त्वचा पुसून न घेता टोनर चेहऱ्यावर तसेच ठेवावे. यामुळे ते त्वचेमध्ये शोषले जाईल. दिवसभरातून दोन ते तीन वेळा नियमित चेहऱ्यावर टोनर लावल्यास त्वचा सुंदर आणि उजळदार दिसेल. टोनर लावल्यामुळे त्वचा घट्ट होते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आवर्जून काकडीचे सेवन केले जाते. यामध्ये ९० टक्के पाणी असते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. काकडी त्वचेला हायड्रेट ठेवते तर तुळशीची पाने चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करतात. तुळशीच्या पानांमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म चेहऱ्यावर डाग कमी करून त्वचा आतून स्वच्छ करतात. चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी काकडी तुळशीचे टोनर वापरावे.