Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील सर्वात Haunted Beach, इथे आहे भयानक आत्मांचे वास्तव… चुकूनही जाण्याची हिंमत करू नका

Dumas Beach: भारतातील या समुद्रकिनाऱ्याला सर्वात भितीदायक समुद्रकिनारा मानले जाते. स्थानिकांच्या मते, इथे अनेक आत्म्यांचे वास्तव आहे. ठिकाणाची खासियत म्हणजे इथे काळ्या रंगाची वाळू पाहायला मिळते जी ठिकाणाला थरारक रुप देते

  • By नुपूर भगत
Updated On: May 05, 2026 | 03:31 PM
भारतातील सर्वात Haunted Beach, इथे आहे भयानक आत्मांचे वास्तव... चुकूनही जाण्याची हिंमत करू नका

भारतातील सर्वात Haunted Beach, इथे आहे भयानक आत्मांचे वास्तव... चुकूनही जाण्याची हिंमत करू नका

Follow Us
Close
Follow Us:
  • ठिकाणाची ओळख शांततेसोबतच गूढ आणि भितीदायक वातावरणासाठीही आहे
  • रात्रीच्या वेळी इथे जाण्याबाबत अनेक विचित्र दावे केले जातात
  • स्थानिक कथांमुळे या ठिकाणाभोवती रहस्य आणि भीतीचे सावट निर्माण झाले आहे
प्रवासाचा विषय आला की, समुद्रकिनारा सर्वांच्याच मनात येतो. निळाशार समुद्र, शांत वातावरण आणि हवेची ती लहर मनाला प्रसन्न करुन जाते. हेच कारण आहे की शहराच्या गडबटापासून दूर लोक समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्याची अधिकतर निवड करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? देशात एक असा समुद्रकिनारा देखील आहे जिथे जाणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते. आम्ही बोलत आहोत, देशातील सर्वात धोकादाय मानल्या जाणाऱ्या समुद्रकिनाऱ्याविषयी… हे ठिकाण गुजरात राज्यात वसले असून याला भारतातील सर्वात भयानक समुद्रकिनारा म्हटले जाते. असे मानले जाते की, रात्रीच्या प्रहरी जो कोणी या समुद्रकिनाऱ्याला भेट देतो तो इथून परत येत नाही किंवा त्यांना अत्यंत भितीदायक असे अनुभव येतात. चला इथे नक्की असं काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

भूतांचे वास्तव

अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला डुमास बीच, गुजरातमधील सर्वात भितीदायक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो. या समुद्रकिनाऱ्यावर काळ्या रंगाची वाळू पाहायला मिळते. डुमास बीचचा एकेकाळी स्मशानभूमी म्हणून वापर केला जात होता आणि म्हणूनच, हे ठिकाण अशा अनेक भुतांचे वास्तव असल्याचे सांगितले जाते. असे मानले जाते की, भूतांनी हा परिसर कधीही सोडला नाही आणि ते इथेच राहतात.

समुद्रकिनाऱ्यावर लोक झालेत गायब

स्थानिकांचा दावा आहे की, इथली काळी वाळू ही अंत्यसंस्कार केलेल्या अवशेषांची राख आहे. वाळूत मिसळल्यामुळे त्याला काळा रंग मिळाला. तथापि या दाव्याबाबत कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. हे खरे आहे की इथे गेल्यावर लोकांना नक्कीच एक विचित्र अनुभव मिळतो. आजूबाजूचा परिसर सुंदर असला तरी तो निराशाजनक वाटतो. असे म्हटले जाते की, इथे भरपूर नकारात्मकता भरलेली आहे. चंद्र उगवल्यानंतर, तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर एकही माणूस दिसणार नाही. गुजरातच्या या डुमास बीचवर अनेक पर्यटक अचानक गायब झाल्याचे वृत्त आहे. एकदा इथे व्यक्तीचा मृतदेह देखील आढळून आला होता.

भारतात या गावात पाण्यावर तरंगणारा रस्ता, शहरापासून दूर इथे मिळेल पर्यटनाचा अद्भुत अनुभव

विचित्र आवाज ऐकायला येतात

अनेकांना इथे विचित्र आणि भितीदायक आवाज ऐकल्याचा दावा देखील केला आहे. रात्रीच्या प्रहरी इथे लोकांना कुणाचा तरी रडण्याचा आवाज ऐकू येतो. इतकेच नाही तर स्थानिकांच्या मते, समुद्रकिनाऱ्यावर भूतांचा वावर आहे, यामुळे रात्रीच्या वेळी इथे कुणीही जाण्याची हिम्मत करत नाही. डुमास बीचवर पोहचणे फार सोपे आहे. अनेक मार्गांनी इथे पोहचता येते. सुरत शहरापासून अंदाजे २० किमी अंतरावर असलेल्या या बीचवर पोहोचायला फक्त अर्धा तास लागतो. शहरातून डुमास बीचपर्यंत जाण्यासाठी अनेक सार्वजनिक वाहतूक सेवा देखील उपलब्ध आहेत.

 

Web Title: Gujrat dumas beach is the most haunted place of india travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • Beach
  • Gujrat
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News: भारतातील “मँगो सिटी” कुठे आहे माहिती आहे का? उन्हाळ्यात देऊ शकता भेट…
1

Travel News: भारतातील “मँगो सिटी” कुठे आहे माहिती आहे का? उन्हाळ्यात देऊ शकता भेट…

Summer Vacation : कोणत्याही झंझटशिवाय प्लॅन करा आयलँड ट्रिप, लक्षद्वीप जाणं झालं सोप; महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या
2

Summer Vacation : कोणत्याही झंझटशिवाय प्लॅन करा आयलँड ट्रिप, लक्षद्वीप जाणं झालं सोप; महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

Mini Thailand Of India : हिरवळ, धबधबा आणि शांतता… भारतातील मिनी थायलंड कुठे आहे माहिती आहे का?
3

Mini Thailand Of India : हिरवळ, धबधबा आणि शांतता… भारतातील मिनी थायलंड कुठे आहे माहिती आहे का?

उन्हाळ्यात मुंबईपासून जवळ महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या, इथले सौंदर्य तुमची समर ट्रिप करतील संस्मरणीय
4

उन्हाळ्यात मुंबईपासून जवळ महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या, इथले सौंदर्य तुमची समर ट्रिप करतील संस्मरणीय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.