(फोटो सौजन्य: Instagram)
Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट
केरळ राज्यातील अलाप्पुझा जिल्ह्याच्या कुट्टनाड प्रदेशात वसलेले वेलियानाड गाव हे त्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यासाठी ओळखले जाते. येथील शेतजमिनी समुद्रसपाटीपाटीच्या खाली आहेत. याच्या सभोवतालच्या खाड्या या ठिकाणाला अद्वितीय बनवतात. या गावाच्या एकंदरीतच रचनेत पाणी आणि जमिन यांचा संगम असल्याने ठिकाणाचे साैंदर्य आगळीक वाटते. या गावाला जलविश्व या नावानेही ओळखलं जातं. इथले रस्ते पाण्यातून जातात. पावसाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा या रस्त्यांचे काही भाग पाण्याखाली जातात. खरंतर प्रत्यक्षात हे रस्ते जमिनीवर बांधण्यात आले आहेत पण पाहताना मात्र ते पाण्यावर तरंगताना दिसून येतात. हे अनोखे दृष्य पर्यटकांना सुंदर अनुभव देऊन जाते.
वेलियानाड हे गाव आपल्या अद्वितीय साैंदर्यासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीसाठी ओळखले जाते. पाणी, हिरवळ आणि शांत वातावरणाने वेढलेले हे गाव शहराच्या गजबटाहून एकदम वेगळे आहे. येथील पारंपरिक केरळी संस्कृती, बोटीवरील जीवन आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देऊन जाते. या गावात दिसून येणारे दृष्य तुम्हाला क्वचितच दुसरे कुठे पाहता येते.
View this post on Instagram
A post shared by Mujeeb Padikka | Travel Photographer | Kerala | India (@tripwithmp)
गावाला जायचे कसे?
वेलियानाड हे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात वसलेले आहे, इथे तुम्ही रस्ते मार्गाने जाऊ शकता. सर्वात जवळते शहर चंगनासेरी आहे, जे सुमारे १० किमी अंतरावर आहे. इथे पोहचण्यासाठी तुम्हा रेल्वे मार्गाचाही वापर करु शकता. तसेच विमानाने जात असाल तर कोची हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. इथून टॅक्सी किंवा बस करुन वेलियानाडला पोहचता येते.






