3) तोंडात किंवा श्वासात दुर्गंधी
जेवण झाल्यानंतर दोन्ही वेळा चमचाभर बडीशेप चघळल्याने तोंडाचा वास काही दिवसात जातो आणि पाचन क्रिया पण सुधारते.
4) तुळशीची चार पाने रोज खाऊन वरून पाणी प्यायल्याने तोंडाचा वास जातो.
5) एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून त्या पाण्याने रोज सकाळी चुळा भरल्यास, तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.
जेवणानंतर एक लवंग चघळल्याने तोंडाचा वास जातो.
6) डाळिंबाच्या सालीचे चूर्ण 4 ग्राम घेऊन फक्की मारावी व पाणी प्यावे. साल उकळून त्या पाण्याने चूळा भरल्याने सुद्धा तोंडाची दुर्गंधी जाते
7) जिरे भाजून खाल्ल्याने तोंडाचा घाण वास जातो.
धने खाल्याने तोंडात सुवास येतो. जेवण झाल्यावर थोडे धने अवश्य खाल्ले पाहिजे.
8) एक चमचा आल्याचा रस 1 ग्लास गरम पाण्यात टाकून त्याने चूळ भरल्यास तोंडाचा घाण वास जातो.
तोंडातली चव जाणे
9) एक लिंबू कापून त्याच्या अर्ध्या फोडीत दोन चिमूट काळे मीठ व मिरपूड शिंपडून लिंबाला आगीत थोडे गरम करावे. नंतर तो लिंबू चोखल्याने जिभेचा कडवतपणा जाऊन जिभेला चव येते व अपचन आणि गॅसेस पण बरे होतात.
10) तोंडात कडवटपणा असल्यास असेल तर डाळिंबाची साल पाण्यात उकळावे व त्यात थोडी बडीशेप टाकून चुळा भराव्यात.






