
पोटाला वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात करा 'या' फळांचा समावेश, अपचनाच्या त्रासापासून मिळेल सुटका
पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी उपाय?
ऍसिडिटी वाढण्याची कारणे?
जळजळ कमी करण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे?
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. आहारात सतत तिखट, अतिमसालेदार, तेलकट आणि जंक फूडचे सेवन केल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम होतात. पचनास जड असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे खाल्लेले अन्नपदार्थ लवकर पचन होत नाहीत आणि आतड्यांमध्ये वायू तयार होतो. आतड्यांमध्ये तयार झालेल्या वायूमुळे पचनक्रियेवर तणाव येण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे संपूर्ण आरोग्य बिघडते. आतड्यांमध्ये घाण साचून राहिल्यास बद्धकोष्ठता, ऍसिडिटी इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये सहज पचन होणारे पदार्थ खावेत.(फोटो सौजन्य – istock)
बऱ्याचदा अतितिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जळजळ वाढते. पोटाला सूज आल्यानंतर काहीवेळा असह्य वेदना होतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. यामुळे तात्पुरता फरक पडतो. मात्र कालांतराने पुन्हा एकदा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. पोटात जळजळ वाढल्यामुळे अन्नपदार्थ खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. पोटात ऍसिडिटीचे प्रमाण वाढल्यामुळे पोटात खूप जास्त जळजळ आणि उष्णता वाढते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटाला आलेली सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
वारंवार अपचन आणि ऍसिडिटीच्या समस्या उद्भवत असेल तर तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन न करता आहारात फळे खावी. फळे खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. फळांमध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. याशिवाय विविध फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आहारात फायबर, विटामिन सी असलेल्या फळांचे जास्त सेवन करावे. यामुळे पचनक्रिया आणि त्वचा चमकदार राहण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणानंतर नियमित एक किंवा दोन केळी खाल्ल्यास पचनक्रिया सुरळीत राहील आणि शरीराला आवश्यक पोटॅशियम मिळेल. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि हृदय मजबूत ठेवण्यासाठी नियमित २ केळी खावीत.
मेंदूच्या पेशी दीर्घकाळ राहतील मजबूत आणि तीक्ष्ण! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीदार फळे जास्तीत जास्त खावीत. नियमित विविध रंगाची फळे शरीराला भरपूर पोषण मिळेल. ताज्या आणि हंगामी फळांचे सेवन करणे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. याशिवाय पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी ताक, दही, थंड दूध प्यावे. यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. शरीरात ऍसिडिटीचे प्रमाण वाढल्यानंतर संत्री किंवा आंबट फळांचे सेवन करणे टाळावे. आंबट फळांच्या सेवनामुळे आणखीनच ऍसिडिटी वाढते.
Ans: वेळेवर जेवण न करणे. जास्त मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाणे.
Ans: छाती आणि घशात जळजळ होणे, आंबट किंवा कडवट ढेकर येणे.
Ans: एक ग्लास थंड दूध प्यायल्याने पोटातील ऍसिड शांत होते.