
सतत पडणाऱ्या पावसामुळे पायांवरील खाज - फंगल इन्फेक्शनचा धोका वाढला आहे? 'हे' सोपे उपाय केल्यास बॅक्टेरिया होतील नष्ट
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. थंड वातावरणामुळे गर्मीपासून सुटका मिळते पण त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात. साचून राहिलेल्या पावसाच्या पाण्यात पाय भिजल्यामुळे खाज, रेडनेस आणि फंगल इन्फेक्शन वाढण्याची खूप जास्त शक्यता असते. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पायांच्या समस्या अतिशय सामान्य आहेत. पण वेळीच लक्ष न दिल्यास त्वचा आतून कुजण्याची शक्यता असते. पायांमध्ये वाढलेल्या ओलाव्यामुळे आणि घामामुळे बॅक्टेरिया व फंगस वेगाने वाढते. याशिवाय पायांमधून दुर्गंधीचा वास सुद्धा येतो. त्यामुळे पावसाळ्यात पायांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात पायांमध्ये वाढलेल्या खाज – फंगल इन्फेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास पायांची त्वचा स्वच्छ राहील.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात किंवा इतर वेळी बाहेरून आल्यानंतर पाय स्वच्छ करणे फार आवश्यक आहे. पायांच्या स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यास पायांना हानी पोहचण्याची शक्यता असते. टबमध्ये गरम केलेले पाणी ओतून त्यात जाड मीठ किंवा घरातील बारीक मीठ टाकून त्यात पाय बुडवून ठेवावे. १० ते १५ मिनिटं पाण्यात बुडवून ठेवल्यामुळे वेदनांपासून सुटका मिळेल. मिठातील अँटी-बॅक्टेरिअल गुण त्वचेवरील फंगस नष्ट आणि खाज नष्ट करण्यास मदत करेल. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा मिठाच्या पाण्यात पाय बुडवून ठेवावेत.
कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात. कडुलिंबाची पाने गरम पाण्यात उकळवून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या पाण्याने पाय स्वच्छ केल्यास इन्फेक्शनचा धोका कमी होईल. याशिवाय इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी कडुलिंबाची पाने आणि तेल एकत्र मिक्स करून लावा.यामुळे वाढतो खा आणि जळजळ कमी होण्यास मदत होईल.
पावसाळ्यात पायांची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. तुरटीच्या पाण्याने पाय स्वच्छ केल्यास दुर्गंधी आणि इन्फेक्शनपासून सुटका मिळेल. पायांवर तुरटी फिरवून काहीवेळ पाण्यात पाय टाकून बसावे. तुरटीमध्ये असलेले अँटी-सेप्टिक आणि अँटी-फंगल गुणधर्म पायांमध्ये वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यास मदत करेल. याशिवाय पायांवरील त्वचा कायमच स्वच्छ राहील. इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी अंघोळ केल्यानंतर पाय आणि पायांच्या बोटांमधील त्वचा व्यवस्थित कोरडी करावी.पायांमधील ओलावा कमी करण्यासाठी रोज टॅल्कमऐवजी अँटी-फंगल पावडरचा नियमित वापर करावा. यामुळे पायांमधील त्वचा कोरडी राहील.