
शरीर आतून थंड ठेवण्यासाठी घरीच बनवा पान-गुलकंद सरबत
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाला काहींना काही थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दही, ताक, लस्सी, कोल्ड्रिंक, सोडा यांच्यासह बाजारात उपलब्ध असलेले पॅक बंद फळांचे सरबत सुद्धा प्यायले जातात. पण नेहमीच पॅक बंद फळांचे ज्यूस ;कोल्ड्रिंक किंवा सोडा असलेले पेय पिणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. यामुळे पचनासंबंधित गंभीर आजार सुद्धा होऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पान गुलकंद सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. विड्याच्या पानांचा वापर करून बनवलेले सरबत चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरात खूप जास्त उष्णता वाढते आणि घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडून गेल्यामुळे थकवा, अशक्तपणा येतो. अशावेळी कोणतेही विकतचे कोल्ड्रिंक किंवा सरबत पिण्याऐवजी घरी बनवलेले थंडगार पान गुलकंद सरबत बनवून प्यावे. यामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होईल आणि शरीराला भरमसाट फायदे होतील. विड्याचे पान खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. तर गुलकंद खाल्ल्यामुळे पोटात थंडावा राहील. पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी गुलकंद खावे. चला तर जाणून घेऊया पान गुलकंद सरबत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)