
मासिक पाळी वेळेवर येत नाही? मग आजीबाईच्या बटव्यातील 'या' पदार्थांचे सेवन केल्यास पाळीच्या चक्रात कधीच होणार नाही बदल
मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्याची कारणे?
मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी काय खावे?
पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी उपाय?
प्रत्येक महिन्याला सर्वच स्त्रियांना मासिक पाळी येते. पाळी येण्याच्या आधी आणि आल्यानंतर महिलांच्या शरीरात असंख्य बदल होतात. मासिक पाळीच्या ३ ते ५ दिवस येते. या दिवसांमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. पण बऱ्याचदा शरीरात होणारे हार्मोनल बदल शरीरासाठी अतिशय धोकादायक ठरतात. हार्मोन्सचे असंतुलन झाल्यानंतर मासिक पाळीच्या चक्रात बिघाड होतो आणि मासिक पाळी काहीवेळा खूप जास्त उशिरा येते तर काहीवेळा खूप लवकर सुद्धा येण्याची शक्यता असते. कामाची धावपळ, चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांचा अभाव, शारीरिक हालचालींची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)
महिलांना दोन ते तीन महिने मासिक पाळी आली नाही की महिला लगेच मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण चुकीच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे मासिक पाळी वेळेवर येण्याऐवजी गर्भाशयासंबंधित आजारांची लागण होते. मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी केवळ गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आजीबाईच्या बटव्यातील उपाय सुद्धा अतिशय प्रभावी ठरतात. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. हे पदार्थ शरीराला भरपूर पोषण देतात आणि आरोग्य सुधारतात.
मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी कच्च्या पपईचे किंवा पिकलेल्या पपईचे सेवन करावे. दोन ते तीन दिवस नियमित पपई खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढते आणि मासिक पाळी वेळेवर येते. पपईमध्ये कॅरेटीन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनला उत्तेजित होते. पपईच्या सेवनामुळे गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात, ज्यामुळे मासिक पाळी वेळेवर येण्यास मदत होते.
दोन ते तीन महिने मासिक पाळी न आल्यास आल्याचा रस आणि गूळ एकत्र करून प्यावे. आलं किसून त्यातील रस काढून घ्या आणि त्यात गूळ मिक्स करा. तयार केलेला रस प्यायल्यास दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला मासिक पाळी येईल. आल्याचा रस कोमट पाण्यासोबत प्यायल्यानंतर शरीरात उष्णता वाढेल आणि रक्तभिसरण सुधारेल.
तुम्हीही चहात बिस्किट बुडवून खाता का? तुमची ही सवय वाढवेल आरोग्याचा धोका, आजच माहिती करून घ्या
दालचिनी शरीरासाठी अतिशय उष्ण मानली जाते. दालचिनीच्या पाण्याचे सेवन केल्यानंतर इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहण्यासोबतच शरीरात हार्मोन्स सुद्धा संतुलित राहतात. पीसीओडी किंवा पीसीओएसच्या त्रासाने त्रस्त असलेल्या महिलांनी दालचिनीचे सेवन करावे. रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात दालचिनी पावडर मिक्स करून प्यायल्यास मासिक पाळी वेळेवर येईल.
Ans: हार्मोनल असंतुलन, ताण-तणाव, वजनात बदल, PCOS, चुकीचा आहार किंवा जीवनशैलीमुळे पाळी उशिरा येऊ शकते.
Ans: आलं, हळद, गुळ, बडीशेप, तीळ यांसारख्या पदार्थांचे सेवन केल्यास पाळी नियमित होण्यास मदत होऊ शकते.
Ans: पपई, अननस, गाजर, मेथी, गुळ-तीळ यांचा आहारात समावेश केल्यास फायदा होऊ शकतो.