
Water Of Tears : देशातील या तलावाला 'अश्रूंचं तलाव' का म्हटल जात? कुठे वसलं आहे ते जाणून घ्या
सरोवराचे नाव काय?
आम्ही तुम्हाला सांगतो की, या अनोख्या तलावाचे नाव उमियाम असून हे नाव खासी भाषेतून घेण्यात आले आहे. खासी भाषेत ‘उम’ म्हणजे पाणी आणि ‘इयाम’ म्हणजे अश्रू, म्हणूनच याला ‘अश्रूंचे पाणी’ असे नाव पडले. या तलावाविषयी एक खास कथा देखील सांगितले जाते, ज्यानुसार हे तलाव दुःखातून निर्माण झाले आहे. मानले जाते की, एकेकाळी स्वर्गातून दोन बहिणी पृथ्वीला भेट देण्यासाठी आल्या होत्या पण यावेळी एक बहिण वाटेतच हरवली. दुसऱ्या बहिणीने आपल्या हरवलेल्या बहिणीचा खूप शोध घेतला पण काही केल्या ती सापडली नाही. यानंतर तिच्या आठवणीत दुसरी बहिण इतकी रडली की तिच्या अश्रूंनी उमियाम तलाव निर्माण झाले. हेच कारण आहे की याला ‘अश्रूंचे पाणी’ म्हणून ओळखले जाते. या कथेमुळे या सरोवराला एक गूढ वलय प्राप्त झाले आहे. तर काही स्थानिक लोक या तलावाला ‘बारपाणी’ या नावानेही ओळखतात ज्याचा अर्थ ‘मोठे पाणी’ असा होतो.
कुठे वसले आहे हे अनोखे तलाव?
तुम्हाला जर ‘अश्रूंचे पाणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तलावाला भेट द्यायची असेल तर यासाठी प्रथम तुम्हाला मेघालय गाठावे लागेल. शिलाँगपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर हे तलाव वसले आहे. इथे तुम्हाला हिरवेगार रान, सुंदर पर्वते आणि स्वच्छ पाणी पाहता येईल. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात इथे सुंदर फोटो आणि व्हिडिओ देखील शूट करु शकता. येथील शांत आणि थंड वातावरण मनाला सुखद अनुभव देऊन जातो. शहराच्या धावपळापासून दूर तुम्हाला कोणत्या शांत आणि सुंदर ठिकाणाला भेट द्यायची असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल.
एक अनोखे मंदिर जिथल्या दगडांमधून ऐकायला येत मधुर संगीत, विज्ञानालाही घातलंय याने कोड…
भेट देण्यासाठीची सर्वोत्तम वेळ कोणती?
उमियाम तलावाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते एप्रिल महिन्यातील काळ सर्वात उत्तम मानला जातो. ही वेळ सर्वोत्तम मानली जाते कारण याकाळात इथे पाऊस कमी प्रमाणात असतो आणि वातावरणातही थंडावा असतो. ज्यांना पावसाळा आवडतो ते इथे पावसाळ्यतही आपल्या सहलीचे नियोजन करु शकतात. याकाळातही हे ठिकाण सुंदर दिसते.