
Positive Quotes : भीतीवर मात कशी करायची? गीतेतील श्लोक सांगतात सोपा आणि प्रभावी मार्ग
१. आत्मा कधीही नाश पावत नाही.
“नैनम छिंदन्ति शास्त्राणी नैनम दहति पावकह…”
हा श्लोक स्पष्ट करतो की, व्यक्तीचा आत्मा हा कधीही नष्ट होत नाही. शरीराचा नाश होतो पण आत्मा मात्र अमर राहतो आणि जेव्हा आपल्याला समजते की, आपले खरे स्वरुप कधीही मिटू शकत नाही तेव्हा आपल्या मनातील भिती आपोआप कमी होऊ लागते.
२. आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन…”
या श्लोकाचा अर्थ असा होतो की, आपण आपल्या कर्मावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे त्याच्या फळावर नाही. जेव्हा आपण कोणत्याही परिणामांची चिंता न करता आपले काम करतो तेव्हा अपयशाची भीतीसुद्धा नाहीशी होते.
३. आपले मन स्थिर ठेवा
“योगस्थ कुरु कर्मणी…”
हा श्लोक आपल्याला सांगतो की, फळाची अपेक्षा न करता मन शांत आणि संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे. जेव्हा मन स्थिर राहते तेव्हा भितीचा प्रभाव कमी होऊ लागतो. याचा परिणाम असा होऊ लागतो की, आपण योग्य निर्णय घेण्यास तयार होतो.
देशातील या ठिकाणाला म्हटलं जात हजारो मंदिराचं शहर, अनोखा आहे इथला इतिहास
४. भीती सोडून पुढे जा
“क्लब्यं म स्म गमह पार्थ…”
हा श्लोक आपल्याला सांगतो की, कधीही आपण अधैर्य किंवा दुर्बलता स्वीकारली नाही पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा धैर्याने स्वीकार करायला हवा आणि हिच शिकवन प्रभू श्रीकृष्णाने अर्जुनाला दिली होती. असे केल्याने आपण भितीला बळी पडत नाही.
५. श्रद्धा आणि संयम ठेवा.
गीता आपल्याला शिकवते की, जीवनातील प्रत्येक परिस्थिती ही तात्पुरती असते. आपण संयम आणि श्रद्धा ठेवल्यास कोणत्याही भीतीचा सामना सहजपणे करू शकतो आणि तेही कोणत्या भितीशिवाय.