
भारताच्या या शहरांना म्हटले जाते 'पर्वतांची राणी', नैसर्गिक सौंदर्य आणि आल्हाददायी वातावरण परदेशी पर्यटकांना करते आकर्षित
कोणत्या शहरांना म्हटले जाते पर्वतांची राणी
देशातील दोन शहरांंना पर्वातांची राणी म्हणून ओळखले जाते. ही दोन ठिकाणे म्हणजे मसूरी आणि शिमला. ही दोन्ही शहरे आपल्या नैसर्गिक साैंदर्यासाठी ओळखली जाते. उत्तराखंड राज्यातील डेहराडून जिल्ह्यात मसूरी वसले आहे. डेहराडूनपासून साधारण ३५ किलोमीटर अंतरावर वसलेले हे ठिकाण इथल्या थंड हवेसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. मसूरीमध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर आणि नयनरम्य ठिकाणे आहेत. इथे तुम्ही केम्प्टी फॉल्स, गन हिल, मॉल रोड आणि लाल टिब्बा यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. इथे इतिहास आणि पारंपारिक वास्तुकलेची अनोखी झलक पाहायला मिळते.
नॅचरल ब्यूटीसाठी लोकप्रिय आहे दुसरे ठिकाण
शिमला देखील एक असे शहर आहे ज्याला पर्वतांची राणी म्हणून ओळखले जाते. शिमलात जंगल आणि निसर्गरम्य टेकड्या पाहायला मिळतात. उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे २,२०० मीटर (७,२३८ फूट) उंचीवर वसलेले हे ठिकाण ब्रिटिशांच्या काळापासून ‘क्वीन ऑफ हिल्स’ या नावाने ओळखले जाते. शिमलात तुम्ही मॉल रोड, जाखू मंदिर , ख्राइस्ट चर्च, लक्कर बाजार यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
Travel News : पाण्यामध्ये तरंगणारं नॅशनल पार्क, इथे होडीत बसून केली जाते जंगल सफारी
मसूरी आणि शिमला दोन्ही ठिकाणे आपल्या नैसर्गिक साैंदर्यासाठी आणि तिथल्या थंड वातावरणासाठी ओळखले जातात. उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणातून मुक्तता हवी असेल आणि कुठे सुंदर ठिकाणी फिरायला जायचं असेल तर तुम्ही पर्वतांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसूरी आणि शिमलाची निवड नक्कीच करु शकता.