Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Relationship Tips: लग्न कधी करावे आणि योग्य जोडीदार कसा ओळखावा? योग्य जोडीदार निवडण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची नक्की करा खात्री

Relationship Tips: ज्या व्यक्तीशी लग्न होणार आहे, त्याच्यासोबत मनमोकळेपणाने बोलता येणे फार महत्वाचे आहे. कारण भीती वा संकोच बाळगल्यास लग्न करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो हे वेळीच लक्षात येत नाही. त्यामुळे नात्यांमध्ये संवाद असणे फार महत्वाचे आहे.

  • By सुरुची कदम, दिपाली नाफडे
Updated On: Sep 10, 2026 | 02:45 PM
लग्न कधी करावे आणि योग्य जोडीदार कसा ओळखावा? योग्य जोडीदार निवडण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची नक्की करा खात्री

लग्न कधी करावे आणि योग्य जोडीदार कसा ओळखावा? योग्य जोडीदार निवडण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची नक्की करा खात्री

Follow Us
Follow Us:

Relationship Tips: एक ठराविक वय झालं की घरी आई-वडिलांपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच जण ‘लग्न कधी करणार’ या प्रश्नाने डोक्याचा भुगा करून सोडतात. लग्नाच्या बाबतीत प्रत्येकाची काही वेगळी स्वप्नं असतात. तर आताची पिढी ही आई-बाबांनी सांगितलं आहे म्हणून लग्न करण्यातली तर अजिबातच नाहीये. बरं लग्न नक्की कधी करावं, आपला जोडीदार योग्य आहे की नाही असं १ ते १०० प्रश्न मनात असतात आणि याची उत्तरं नक्कीच आईबाबा नीटसं देतात असं या मुलांना वाटत नाही. वय कितीही असो, पण जेव्हा मनासारखा आणि समजून घेणारा जोडीदार भेटतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रवासाची खरी सुरुवात होते. मग आता नक्की योग्य जोडीदार कसा ठरवावा आणि लग्न कसं ठरवावं याबाबतच हा व्हिडिओ तुमची मदत करणार आहे.(फोटो सौजन्य – istock)

Relationship Tips: मनातून नातं संपलंय की अजूनही अडकले आहात? Move On झाल्याचे ‘हे’ बदल नक्कीच ओळखा

माणसातील प्रगल्भता ही महत्त्वाची असते. व्यक्ती फक्त वयाने नाही तर वागण्यानेही मॅच्युअर असावी. म्हणजे काय तर स्वतःचे निर्णय स्वतः घेणे, संकटकाळात योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि संयम राखणे, आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेणे हे आपण ३-४ वेळा भेटून समोरच्या व्यक्तीबाबत समजून घ्यायला पाहिजे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक स्वावलंबन:

स्वतःचा किंवा आपल्या कुटुंबाचा खर्च पेलण्याची ताकद आपल्या जोडीदारामध्ये असायला हवी. आता दोघेही कमावते आहेत. पण दोघांनीही एकमेकांकडे या गोष्टी मनापासून बोलाव्यात. नोकरी, व्यवसाय, आयुष्यात उत्पन्नाचं साधन काय असणार हे सर्व बोललात तर भविष्यात येणारे ताण टाळता येऊ शकतात.

आपली ध्येय काय आहेत हे दोघांनी एकमेकांशी क्लिअर करावे:

करिअर असो वा शिक्षण असो. आपण प्रत्येकाने काही ध्येयं ठरवलेलं असतं. ते एकमेकांसह बोलून मगच पुढचं पाऊल तुम्ही उचलू शकता. म्हणजे लग्नानंतर या गोष्टीचं दडपण येणार नाही.

दोघांनाही जबाबदारीची जाणीव असावी:

लग्न म्हणजे काही मजा नाही. नव्या नऊ दिवसानंतर जबाबदारी येणारच असते आणि याची जाणीव ही दोन्ही जोडीदारांना असायलाच हवी. कुटुंबाचा मेळ, जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असायला पाहिजे. दोघांच्या आवडी-निवडी वेगळ्या असतील तर त्याचा ताळमेळ बसायला हवा. भविष्याबद्दलचा दृष्टीकोन जुळणारा असेल तर तफावत येत नाही आणि लग्न करण्याच्या दृष्टीने तुम्ही योग्य पाऊल उचलू शकता.

Mrunal Dusanis: “लग्नाला १० वर्षे, पण ७ वर्षे नवऱ्यापासून दूर”; मृणाल दुसानिसनं लाँग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दल दिला महत्त्वाचा सल्ला

संवाद आणि समज सर्वात जास्त महत्त्वाचा आहे:

आपलं लग्न ज्या व्यक्तीशी होणार आहे त्याच्याशी वा तिच्याशी मनमोकळेपणाने बोलता यायला पाहिजे. कोणतीही भीती वा संकोच बाळगून काहीच फायदा नाही. आपल्या मनात काय आहे हे समोरचा व्यक्ती नीट समजून घेत असेल तरच त्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो हे लक्षात ठेवा. यामध्ये एकमेकांविषयी आदर हवा आणि विश्वासही महत्त्वाचा आहे. तसंच कठीण प्रसंगात आपल्याला ही व्यक्ती साथ देईल याचीही खात्री करून घ्यायला हवी. तुम्हीही लग्न करणार असाल तर या गोष्टी नक्की तपासून पहा आणि त्यानुसारच पुढे पाऊल उचला. कोणाच्याही प्रेशरखाली इतका मोठा निर्णय घेऊ नका.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लग्न कधी करावे हे कसे ठरवावे?

    Ans: लग्नासाठी ठरावीक वयापेक्षा मानसिक तयारी, भावनिक स्थैर्य, जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आणि नात्यात संवाद साधण्याची क्षमता महत्त्वाची आहे.

  • Que: योग्य जोडीदाराची निवड करताना कोणत्या गोष्टी तपासाव्यात?

    Ans: स्वभाव, विचारसरणी, मूल्ये, संवादाची पद्धत, करिअरविषयीचे विचार, आर्थिक नियोजन, कुटुंबाबद्दलची भूमिका आणि भविष्यातील अपेक्षा यांमध्ये सुसंगतता आहे का हे पाहावे.

  • Que: हाच आपला योग्य लाइफ पार्टनर आहे हे कसे ओळखावे?

    Ans: एकमेकांमध्ये विश्वास, आदर, मोकळा संवाद आणि सुरक्षिततेची भावना असेल, मतभेद शांतपणे सोडवता येत असतील आणि भविष्यासंदर्भात मूलभूत अपेक्षा जुळत असतील तर नात्याची पायाभरणी चांगली असू शकते.

Web Title: Relationship tips choosing the right life partner how to know if youre ready for marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • LIFESTYLE
  • relationship advice
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Pithori Amavasya 2026: पिठोरी अमावस्येच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा! आई दुर्गेच्या कृपेने घरात सुख-समृद्धी नांदो
1

Pithori Amavasya 2026: पिठोरी अमावस्येच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा! आई दुर्गेच्या कृपेने घरात सुख-समृद्धी नांदो

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
2

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका
3

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर
4

Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.