
स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार
आरोग्य विभागाचे मोठे पाऊल
स्ट्रोक अर्थात पक्षाघात झालेल्या रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरात धाव घ्यावी लागू नये, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने मोठे पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्येच अत्याधुनिक उपचार मिळावेत, यासाठी ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ या आधुनिक उपचार पद्धतीचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यावाचत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केईएम रुग्णालयात मुख्य रोबोटिक नियंत्रण केंद्र
या संकल्पनेनुसार मुंबईतील केईएम रुग्णालयात येथे मुख्य रोबोटिक नियंत्रण केंद्र उभारले जाणार असून जिल्हा आणि तालुकास्तरीय रुग्णालयांमध्ये दुय्यम केंद्रे कार्यरत राहतील. संगणकीय आणि दूरसंचार प्रणालीच्या माध्यमातून मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय पथकाच्या मदतीने स्ट्रोकवरील जटिल उपचार प्रक्रिया दूरस्थ पद्धतीने पार पाडतील. केईएमचे वरिष्ठ हायब्रिड न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची प्राथमिक चाचणी आणि नियोजन सुरू आहे. आरोग्य विभाग राज्यात सुरू करीत असलेल्या ११ कॅथलॅबपैकी पाच केंद्रांवर प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्याचा विचार आहे.
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले की, “८ स्ट्रोक रुग्णांसाठी पहिला तास अत्यंत महत्वाचा असतो. रुग्णांना शहरात हलवण्यात वेळ घालवण्याऐवजी त्यांच्या जवळच्या शासकीय रुग्णालयातच अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्याचा आरोग्य विभागावा प्रयत्न आहे”.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)