
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील 'हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण
मासिक पाळी आल्यानंतर पोटात वेदना का वाढतात?
मूड सुधारण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
स्वयंपाकघरातील कोणते पदार्थ मासिक पालीवर रामबाण?
सर्वच महिलांना महिन्यातील ४ किंवा ५ मासिक पाळी येते. हे नैसर्गिक मासिक पाळीचे चक्र महिलांच्या शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. पाळीच्या तीन ते चार दिवसांमध्ये महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी येण्याच्या आधी आणि मासिक पाळी आल्यानंतर शरीरात हार्मोनल बदल होत असतात. या बदलांमुळे काहींना खूप जास्त त्रास होतो. पोटात दुखणे, कंबर दुखणे, उलट्या, मळमळ, मूड सतत बदलत राहणे इत्यादी अनेक दिसू लागतात. हेवी रक्तस्त्राव होत असल्यास बाहेर पडणे सुद्धा अवघड होऊन जाते. पोटात दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक महिला मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करतात. पण वारंवार पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्यामुळे मासिक पाळीच्या समस्या आणखीनच वाढण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, शरीरात होणारे हार्मोनल बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे पाळीच्या दिवसांमध्ये पौष्टिक आहार आणि शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करणे फार गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी किचनमधील कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. याशिवाय पाळीच्या त्रासापासून सुटका मिळवून देतात.
जेवणाला फोडणी देण्यासाठी जिऱ्याचा वापर आवर्जून केला जातो. जिऱ्यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. जेवणात जिरं टाकल्यामुळे चवीसोबतच सुगंध सुद्धा वाढतो. मासिक पाळी दरम्यान पोटात वाढलेला वेदना आणि क्रम्प्स कमी करण्यासाटी जिऱ्याचे पाणी प्यावे. जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते. मासिक पाळी आल्यानंतर गर्भाशयाच्या आतील स्नायू आकुंचन पावतात. ज्यामुळे पोटात आणि कंबरेत तीव्र वेदना वाढून आरोग्य बिघडते. अशावेळी टोपात पाणी गरम करून त्यात जिरं घालून उकळवा आणि पाणी थंड करून प्या. यामुळे लगेच फरक दिसून येईल.
आपल्यातील अनेकांना मासिक पाळी आल्यानंतर खूप जास्त रक्तस्त्राव होतो, यामुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरातील लोहाची पातळी कमी झाल्यानंतर थकल्यासारखे वाटते. त्यामुळे नियमित २ खजूर आणि काळ्या मनुकांचे सेवन करावे. यामुळे शरीरातील लोहाची पातळी संतुलित राहते आणि आरोग्य सुधारते. अशक्तपणा कमी करण्यासाठी मनुका खूप जास्त फायदेशीर ठरतात.
कापलेलं केळं किती वेळात खायला हवं? काळं पडलेलं केळं खाणं सुरक्षित असतं का? जाणून घ्या सविस्तर
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिला खूप जास्त चिडचिड्या होतात. तर काहीवेळा कोणत्याही कारणाशिवाय रडू येणे, मूड अचानक खराब होणे यांसारखी लक्षणे महिलांच्या शरीरात दिसून येतात. त्यामुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्यासाठी भाजलेल्या चण्याचे सेवन करावे. भाजलेले चणे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. यामुळे रक्ताची पातळी सुद्धा वाढते.
Ans: हार्मोन्समध्ये होणारे बदल, ताणतणाव आणि झोपेची कमतरता यामुळे मासिक पाळीदरम्यान मूड स्विंग्स होऊ शकतात.
Ans: हळद, दालचिनी, ओवा, बडीशेप, आलं आणि जिरे हे मसाले पोटदुखी व सूज कमी करण्यास मदत करू शकतात.
Ans: होय. हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होण्यास मदत मिळू शकते.