Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पायाच्या तळव्याला मालिशला सर्वाेत्तम उपाय केल्याने होतात ‘हे’ फायदे

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 31, 2022 | 01:25 PM
पायाच्या तळव्याला मालिशला सर्वाेत्तम उपाय केल्याने होतात ‘हे’ फायदे
Follow Us
Close
Follow Us:

पायाच्या तळव्याला मसाज करणे आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. तळव्यांना मसाज करण्यासाठी पद्धत कोणती, तेल कोणतं हे समजून घ्या. पायाच्या तळव्याला मसाज केल्याने हे फायदे होतात, तळवे मसाज केल्याने शारीरिक आणि मानसिक आराम मिळतो. इतकंच नाही तर शांत झोप लागते, एवढेच नाही तर तळव्यांची मालिश केल्याने अनेक आजार दूर होतात. पायांच्या तळव्याला मसाज करण्याचे फायदे जाणून घेऊया.

निद्रानाश जाऊन झोप लागते

दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री झोप लागणे कठीण होते. झोप न लागण्याच्या समस्येला निद्रानाश म्हणतात. जर तुम्हालाही निद्रानाशाचा त्रास होत असेल तर रोज रात्री झोपताना तळव्यांची मालिश करा. यामुळे तुमचा थकवा दूर होईल, तणाव कमी होईल आणि खूप चांगली झोप मिळेल. पायाच्या तळव्याला मसाज केल्याने शरीराला आराम मिळतो, मन शांत होतं.

तणाव आणि चिंता होईल गायब

आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने तणाव किंवा चिंतेखाली असतो. दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने नैराश्य येऊ शकते. अशा परिस्थितीत, तणाव कमी करण्यासाठी तुम्ही पायाच्या तळव्याची मालिश करू शकता. तळवे मसाज केल्याने तणाव कमी होतो, मानसिक शांती मिळते. तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी, रात्री पायांच्या तळव्याची मालिश करा.

रक्ताभिसरण वाढतं

आयुर्वेदात रक्ताभिसरण वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शरीराला मसाज करणे. आपण सर्वजण डोके, हात आणि पाय मालिश करतो, परंतु तळवे विसरतो. तळवे मसाज करताना संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी पायाच्या तळव्याची मालिश करणे आवश्यक आहे.

मासिक पाळीतील थकवा घालवा

प्रत्येकाने पायाच्या तळव्याची मालिश करावी. परंतु स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदनांमध्ये तळवे मसाज केल्याने आराम मिळतो. याव्यतिरिक्त, यामुळे तणाव आणि थकवा देखील कमी होतो. महिलांनी त्यांच्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तळव्यांची मालिश नक्कीच करावी.

 

तळवे कसे मालिश करावे

  • तळव्यांना मसाज करण्यासाठी सर्वप्रथम कोमट पाण्याने पाय, तळवे चांगले धुवावेत.
  • आता कापड किंवा टॉवेलने पाय आणि तळवे पूर्णपणे पुसून घ्या.
  • यानंतर, तेल हलके गरम करा, दोन्ही पायांच्या तळव्यावर लावा.
  • आता तळव्यांना हाताने मसाज करा. तुम्ही कांस्य धातूच्या वाटीने मसाज करु शकता.
  • त्वचा हळूहळू तेल शोषून घेईपर्यंत पाय जमिनीवर ठेवू नका.
 

Web Title: The best foot massage solution has these benefits nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2022 | 01:25 PM

Topics:  

  • foot massage
  • Health Tips
  • Navrashtra
  • navrashtra news

संबंधित बातम्या

स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस
1

स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस

शहरी भागात वाढतंय जलप्रदूषण, सामान्यांचं आरोग्य धोक्यात; गुणवत्तेवर लक्ष देणं गरजेचं
2

शहरी भागात वाढतंय जलप्रदूषण, सामान्यांचं आरोग्य धोक्यात; गुणवत्तेवर लक्ष देणं गरजेचं

अंशतः गुडघे प्रत्यारोपण ठरतेय Osteoarthritis च्या रुग्णांसाठी वरदान, गुडघेदुखीवर संपूर्ण गुडघा बदलण्याची गरज नाही भासणार
3

अंशतः गुडघे प्रत्यारोपण ठरतेय Osteoarthritis च्या रुग्णांसाठी वरदान, गुडघेदुखीवर संपूर्ण गुडघा बदलण्याची गरज नाही भासणार

नागरिकांनो व्हा सावध! थंडी आणि प्रदूषणाचा दुहेरी मारा; दिल्लीत हेल्थ इमर्जन्सी, हार्ट अटॅक-स्ट्रोकचा धोका वाढला
4

नागरिकांनो व्हा सावध! थंडी आणि प्रदूषणाचा दुहेरी मारा; दिल्लीत हेल्थ इमर्जन्सी, हार्ट अटॅक-स्ट्रोकचा धोका वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.